AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांच्या बंगल्याला सील ठोकलं? नेमकं सत्य काय?

जगदीप धनखड यांच्या शासकीय बंगल्याला सील ठोकण्यात आले आहे असा दावा केला जात आहे. याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने सत्य समोर आणले आहे.

राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांच्या बंगल्याला सील ठोकलं? नेमकं सत्य काय?
jagdeep dhankhar
| Updated on: Jul 23, 2025 | 11:37 PM
Share

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. त्यांनी प्रकृतीचे कारण दाखवत आपला राजीनामा सादर केला. असे असतानाच आता सोशल मीडियावर एक दावा केला जात आहे. उपराष्ट्रपतींच्या बंगल्याला सिल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे पडताळणीतून समोर आले आहे.

सोशल मीडियावर पसरलेली ही अफवा खोटी

राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांना लगेच उपराष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान रिकामे करण्याची सूचना करण्यात आल्याचे आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सिल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र सोशल मीडियावर पसरलेली ही अफवा खोटी आहे. तशी माहिती पीआयबी फॅक्ट चेकने दिली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पीआयपी फॅक्ट चेकने केले आहे.

धनखड यांच्या सामानाची पॅकिंग चालू

मिळालेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे आठवड्याभरात उपराष्ट्रपतींसाठीचे शासकीय निवासस्थान सोडणार आहेत. सोमवारी रात्री त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. आरोग्याचे कारण देत त्यांना हा राजीनामा सोपवला आहे. नियमानुसार माजी उपराष्ट्रपतींना आयुष्यभर शासकीय निवासस्थान दिले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या उपराष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानी धनखड यांच्या सामानाची पॅकिंग चालू आहे. त्यांच्यासाठीच्या नव्या घराची व्यवस्था केली जात आहे.

धनखड यांचे नवे घर कुठे असेल?

नियमानुसार जगदीप धनखड यांना सरकारतर्फे घर दिलं जाणार आहे. त्यांना ल्युटियन्स दिल्ली किंवा अन्य ठिकाणी व्हिआयपी VIII बंगला दिला जाऊ शकतो. टाईप VIII बंगला हा वरिष्ठ केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांना दिला जातो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.