AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय

मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतला निर्णय ऐतिहासिक ठरला. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं.

असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय
manmohan singh
| Updated on: Dec 27, 2024 | 12:15 AM
Share

PM Manmohan Singh Death : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं आज (26 डिसेंबर) निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह यांनी देशाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर गेली. मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं.

डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्प परिचय

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. मनमोहन सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर 1962 साली डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली.

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी  युएनसीटीएडी सचिवालयात काही काळ काम केले. यानंतर 1987 आणि 1990 या काळात त्यांची जीनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉ. मनमोहन सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर 1972 साली डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.

डॉ. मनमोहन सिंग यांनी भूषवली अनेक महत्त्वाची पदे

डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयात अनेक महत्वाची पद भूषवली. यात अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद या पदांचा समावेश होता. यानंतर 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते. हा काळ स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले धोरण तयार केले.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. डॉ. मनमोहन सिंग यांना 1987 या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान(1995), अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 आणि 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अ‍ॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार मिळाले.

अनेक विशेष पुरस्काराने सन्मानित

याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बूनसारख्या अनेक संस्थांनी डॉ. मनमोहन सिंग यांना सन्मानित करण्यात आले. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉ मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनमोहन सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.

मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2009 असे दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.

देशभरात शोककळा

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.