AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण, भाजपला लगावला टोला

ज्यावेळी गुलाम नबी आझाद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्ष मी भाजपमध्ये येणार असल्याचं तीन वर्षांपासून सांगत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील बनवलं असल्याचं जाहीर केलं होतं.

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण, भाजपला लगावला टोला
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण, भाजपला लगावला टोलाImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 26, 2022 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कॉंग्रेस पक्षाच्या (Congress Party) सगळ्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आणि अन्य पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर भाजप पक्षात सामील होणार असल्याची देखील चर्चा होती. परंतु गुलाम नबी आझाद यांनी या सगळ्या तर्कांना पुर्णविराम दिला आहे. मी पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे. त्याचबरोबर मी माझा स्वत:चा पक्ष तयार करणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद इतर पक्षात जाण्याची शक्यता कमी झाली आहे. मागच्या तीन वर्षापासून भाजपमध्ये जात असल्याची भाजपाने चर्चा सुरु केली होती. तसेच ते एव्हढ्यावर न राहता त्यांनी थेट मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील केलं होतं असं गुलाम नवी आझाद यांनी जाहीर केलं आहे.

नव्या पक्षाची स्थापण होणार

सकाळपासून गुलाम नबी आझाद हे नेमकं कोणत्या पार्टीत जाणार अशी चर्चा होती. कारण मागच्या काही महिन्यात ज्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आहे त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद हे भाजपमध्ये जाणार असल्याची मोठी चर्चा होती. पण त्यांनी मी कॉंग्रेस सोडल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर मी तिथं माझा नवा पक्ष स्थापन करणार आहे. भविष्यात तो पक्ष मी राष्ट्रीय राजकारणात आणणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

भाजपाने चुकीचा प्रचार केला

ज्यावेळी गुलाम नबी आझाद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्ष मी भाजपमध्ये येणार असल्याचं तीन वर्षांपासून सांगत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील बनवलं असल्याचं जाहीर केलं होतं. ज्यावेळी त्यांना भाजपच्या नेत्यांचा फोन आला होता का ? असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मला भाजपचे नेते का फोन करतील मी थोडी भाजपमध्ये आहे असं उत्तर दिलं. माझे सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. मी आत्तापर्यंत कोणत्याही पक्षावरती टीका केलेली नाही.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.