AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला जोरदार धडक, दोन्ही गाड्या रेल्वे रुळावरच पलटी; अपघात इतका भयंकर की…

आज पहाटे पहाटेच दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने मालगाडीचे 12 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आहेत.

Video : एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला जोरदार धडक, दोन्ही गाड्या रेल्वे रुळावरच पलटी; अपघात इतका भयंकर की...
| Updated on: Jun 25, 2023 | 8:28 AM
Share

बांकुडा : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आज आणखी एक भीषण अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला समोरून येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की मालगाडीचे 12 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, दुसऱ्या मालगाडीचा मोटरमन जखमी झाला आहे. पश्चिम बंगालच्या बांकुडा येथे ही दुर्घटना घडली आहे.

आज पहाटे 4 वाजता ही भीषण दुर्घटना घडली. एक मालगाडी बांकुराहून बिष्णूपूर येथे जात होती. त्यावेळी ओंदा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळावरील लूप लाइनवर आणखी एक मालगाडी उभी होती. मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावरील मालगाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की मालगाडीचे डब्बे पटरीवरून उतरून एकमेकांवर चढले. मालगाडीचे एकूण 12 डब्बे रेल्वे रुळावरून उतरले आहेत. दोन्ही मालगाड्या रेल्वे रुळावरच पलटी झाल्या आहेत. त्यामुळे इतर रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. या अपघातामुळे पुरुलिया हावडा एक्सप्रेस रद्द करण्यता आली आहे. अनेक ठिकाणी एक्सप्रेस थांबवण्यात आल्या आहेत. तर पोरबंदर संतरागाछी एक्सप्रेसला पुरुलिया स्टेशनहून चांडील टाटानगर मार्गे पाठवले जात आहे.

व्हिडीओ व्हायरल

या रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ट्रेनचं इंजिन ट्रॅकच्या बाहेर गेल्याचं दिसत आहे. मालगाड्यांचे अनेक डब्बे पटरीवरून उतरले आहेत. एका मालगाडीचं प्रचंड नुकसान झाल्याचंही या व्हिडीओतून दिसत आहे. सुदैवाने हा मालगाडीचा अपघात असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. फक्त एका ड्रायव्हरला मार लागला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मालगाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मदत कार्यास सुरुवात केली आहे. तसेच रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

चौकशी होणार

दरम्यान, मालगाड्यांच्या या अपघाताची चौकसी होणार आहे. अधिकाऱ्यांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. ज्या डब्ब्यांचं अधिक नुकसान झालंय ते डब्बे आधी रुळावरून हटवले जात आहेत. या अपघातानंतर आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मालगाड्यांऐवजी एक्सप्रेसचा अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती असं सांगितलं जात आहे. नुकताच ओडिशाच्या बालासोर येथे मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात 250 हून अधिक लोक ठार झाले होते. तर तब्बल एक हजार प्रवासी जखमी झाले होते.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.