AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varun Singh: धीरोदत्त योद्धा: मृत्यूला भिडणारी वरुण सिंगांची शौर्यकहाणी, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

कठीण प्रसंगात मृत्यूला चकवा देणाऱ्या वरुण सिंग यांना आज (बुधवारी) वीरमरण प्राप्त झाले. आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल वरुण सिंग ख्यातकीर्त होते. अत्युच्च शौर्यासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

Varun Singh: धीरोदत्त योद्धा:  मृत्यूला भिडणारी वरुण सिंगांची शौर्यकहाणी, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?
मृत्यूला भिडणारी वरुण सिंगांची शौर्यकहाणी
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 6:01 PM
Share

नवी दिल्ली : तमिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात सरसेनाध्यक्ष बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसहित 13 जणांना प्राणाला मुकावे लागले. या दुर्घटनेत हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. कठीण प्रसंगात मृत्यूला चकवा देणाऱ्या वरुण सिंग यांना आज (बुधवारी) वीरमरण प्राप्त झाले. आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल वरुण सिंग ख्यातकीर्त होते. अत्युच्च शौर्यासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

‘शौर्य’ पुरस्काराने गौरव

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात कॅप्टन वरुण सिंग यांना गौरविले गेले. वरुण सिंग यांनी 2020 मध्ये आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाज पणाला लावली होती. जमिनीपासून हजारो फूट अंतरावर नियंत्रण गमावलेल्या विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवून LCA तेजस विमानाचा दुर्घटनेपासून बचाव केला होता. डोळ्यांत तेल घालून जमीनीपासून हजारो मीटर अंतरावर स्वत:चे आणि सामान्य जनतेचे प्राण वाचवले होते.

काय घडलं त्या दिवशी?

विंग कमांडर वरुण सिंग 12 ऑक्टोबर 2020 या दिवशी हवाई मोहिमेवर होते. जमिनीपासून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळानंतरच विमानाच्या संयंत्रात बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फ्लाईट कंट्रोल सिस्टीम (एफसीएस) आणि प्रेशराईज्ड सिस्टीम नादुरुस्त झाली होती. कठीण प्रसंगात विचलित न होता बिघाडाचे कारण तत्काळ जाणले आणि लँडिंगसाठी विमान कमी उंचीवर घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, विमानाला कमी उंचीवर आणताना फ्लाईट कंट्रोल सिस्टीम (एफसीएस) पूर्णपणे ठप्प झाली होती आणि विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते.

वेग, मृत्यू अन् वेळेशी झुंज

हवाई मोहिमेच्या आजवरच्या अनुभवात अशा कठीण प्रसंग यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. कॅप्टन सिंग यांनी मानसिक संतुलन राखत परिस्थिती पूर्वपदावर आणली. जमीनीपासून हजारो फूट अंतरावर विमानाच्या संयंत्रात बिघाड झाल्यानंतर वैमानिक जीवसंरक्षक साधनांचा वापर करून स्वत:चे प्राण वाचवितात. मात्र, सिंग यांनी विमानावरील ताबा अखेरपर्यंत सोडला नाही. जीवाची बाजी पणाला लावून सिंग यांनी देशाच्या संरक्षण सज्जतेत भर घालणाऱ्या विमानाला दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचविले होते.

कौशल्य, संयम आणि प्रसंगावधान राखत केवळ विमानाचे नुकसानच टळले नाही तर नागरिक, राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी टाळली. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले.

लष्करी सेवेचा पिढिजात वारसा

ग्रूप कॅप्टन वरुण सिंग हे उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात स्थित कन्हौली गावचे रहिवाशी होते. वरुण सिंग यांच्या परिवाराला लष्करी सेवेचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करातून निवृत्त झाले होते व सध्या त्यांचा भाऊ भारतीय नौदलात कार्यरत आहे. पत्नी व एक मुलगा, मुलगी यांच्यासह वेलिंग्टन मध्ये वास्तव्यास होते.कॅप्टन सिंग तमिळनाडूच्या वेलिंग्टन डिफन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे (DSSC) संचालक पदावर कार्यरत होते.

इतर बातम्या

SC on OBC Reservation | राज्य सरकार म्हणाले 6 महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकला; कोर्ट म्हणाले, आम्ही पाहू!

स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिने पुढे ढकला, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, 2 पर्याय सुचवले

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.