AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, 10 वेळा आमदार राहिलेले राठवा यांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश..?

मे महिन्यातच मोहन सिंग राठवा यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आता मला तरुणांना संधी द्यायची असल्याचे स्पष्ट केले होते.

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, 10 वेळा आमदार राहिलेले राठवा यांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश..?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 08, 2022 | 7:05 PM
Share

अहमदाबाद: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला जबर मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि 10 वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह राठवा यांनी मंगळवारी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राठवा आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राठवा पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत होते, त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी मे महिन्यातच मोहन सिंग राठवा यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आता मला तरुणांना संधी द्यायची असल्याचे स्पष्ट केले होते. छोटा उदयपूरचे ज्येष्ठ आणि विद्यमान आमदार म्हणून राठवा यांची ओळख आहे.

त्यावेळी त्यांनी मी आता निवडणूक लढवणार नाही, तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं त्यांनी त्यावेळी मत मांडले होते. मी सलग 11 वेळा निवडणूक लढवली, त्यापैकी 10 वेळा मी जिंकून आलो आहे.

आणि जेतपूर पवी, बोडेली आणि छोटा उदयपूर तालुक्यातील मतदारांनी मला सर्वाधिक वेळा जिंकून गुजरात विधानसभेत पाठवले असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली होती.

राजकारणातील तरुणांचा सहभाग याविषयी बोलताना त्यांनी सांगितले होते की, राजकारणात आता तरुणांना संधी दिली पाहिजे.

त्यावेळी त्यानी छोटा उदयपूर तालुक्यातील 3 गावांतील लहान मुलांना प्राथमिक शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याचे सांगत मी विधानसभेत अनेकवेळा याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले होते.

विशेष म्हणजे मोहन सिंग राठवा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोरदा सुरू होती. त्यानंतर त्यांनीच माध्यमांसमोर येत त्यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.

दुसरीकडे, मोहनसिंग राठवा यांचे मधले पुत्र राजेंद्रसिंग राठवा हे गावोगावी लग्नसमारंभ, भजनाला हजेरी लावून मतदारांच्या सतत संपर्कात असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

मोहन सिंग राठवा यांनी 1980 आणि 1985 मध्ये काँग्रेस उमेदवार अमरसिंह राठवा यांच्या विरोधात जनता पक्षाचे उमेदवार म्हणून 1980 आणि 1985 मध्ये दोनदा लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले होते.

2002 ची गुजरात विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुजरातमधील जातीय दंगलींमध्ये मोहनसिंग राठवा यांना भाजपच्या वेचतभाई बारिया यांनी रोखले. मात्र त्यानंतरही ते जिंकत राहिला.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?