AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सर वाचवा…’, टेबल, खुर्चीखाली लपून महिला पोलिसांनी वाचवले प्राण, हल्द्वानीमध्ये भयंकर घडलं?

Haldwani Violence | कोर्टाच्या आदेशावरुन हे अतिक्रमण हटवलं जात होतं. मागच्या 15 दिवसांपासून हे अभियान सुरु होतं. गुरुवारी कारस्थान रचून पोलिसांना टार्गेट करण्यात आलं. गाड्या पेटवण्यात आल्या. हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला. 130 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत.

'सर वाचवा...', टेबल, खुर्चीखाली लपून महिला पोलिसांनी वाचवले प्राण, हल्द्वानीमध्ये भयंकर घडलं?
haldwani violence
| Updated on: Feb 09, 2024 | 12:19 PM
Share

Haldwani Violence | उत्तराखंडच्या हल्द्वानी शहराने गुरुवारी 8 फेब्रुवारीला मोठा हिंसाचार अनुभवला. या हिंसेत दोघांचा मृत्यू झाला. 130 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. उपद्रवी समाजकंटकांनी पोलिसांना लक्ष्य केलं. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल, अधिकारी अचानक झालेल्या या हल्ल्यासमोर हतबल होते. या दरम्यान स्फोटाचे आवाज झाले. पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. यामुळे एकाबाजूने आग लागली. एक महिला शिपाई वायरलेस सेटवरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत होती. ‘सर आम्हाला वाचवा’ ती बोलत होती, इतक्यात अचानक संर्पक तुटला. पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचेपर्यंत पोलीस स्टेशन जळून खाक झालं होतं. या हिंसाचारात 100 पोलीस जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. हे दगड पोलिसांना लागत होते. टेबल, खुर्चीखाली लपून पोलिसांनी आपले प्राण वाचवले. डीएम वंदना कुमार यांनी सांगितलं की, पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. जमाव पोलीस स्टेशनजवळ आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली नाही. पण समाजकंटकांनी दगडफेक चालू केली.

पोलीस कठोर पावल उचलू शकत होते, पण….

पोलीस स्टेशनबाहेर अनेक गाड्या उभ्या होत्या. मीडियाच्या गाड्या होत्या. जमावाने या गाड्या पेटवून दिल्या. छपरावरुन दगड टाकले जात होते. पोलीस जमावाविरुद्ध कठोर पावल उचलू शकत होते. पण वातावरण खराब होऊ नये, म्हणून पोलीस शांत राहिले.

प्रशासनाच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह

गुरुवारी दुपारी मलिक का बगीचा येथे बेकायद मदरसा आणि नमाज स्थळ तोडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस पोहोचले. अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु झाल्यानंतर तासाभराने समाजकंटकांनी पोलीस टीमवर हल्ला केला. हिंसाचारात पोलीसच नाही, सर्वसामान्य लोकही जखमी झाले. या हिंसाचारानंतर प्रशासनाच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालय. बनभूलपुरा येथे बेकायद धार्मिक स्थळ तोडताना तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याची माहिती प्रशासनाला होती. पण याचा सामना करण्याची तयारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी का नाही केली?

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.