AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू गेलीस, मी तरी जगून काय करू? पत्नीच्या निधनानंतर बसल्या बसल्याच त्यानेही जीव सोडला; एकाच चितेवर दोघांना जळताना पाहून…

पती-पत्नीच्या प्रेमाला वयाची गरज नसते. ते अनंत असतं. आणि तसंच काही घडलं एका गावात. पत्नीच्या निधनानंतर काही वेळातच पतीनेही जीव सोडला. एकाच चितेवर दोघांना अग्नी देण्यात आला.  

तू गेलीस, मी तरी जगून काय करू? पत्नीच्या निधनानंतर बसल्या बसल्याच त्यानेही जीव सोडला; एकाच चितेवर दोघांना जळताना पाहून...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2025 | 8:01 PM
Share

‘साथ जिएंगे साथ मरेंगे’हे वाक्य आपण अनेकदा चित्रपटांमध्ये ऐकलं असेल. पण खऱ्या आयुष्यातही असं काही घडतं का? तर होय, असंच काहीसं घडलं आहे हरियाणातील रेवाडीमध्ये. जिल्ह्यातील पिठनवास गावात एका वृद्ध जोडप्याचा एकमेकांपासून काही मिनिटांच्या अंतरावर मृत्यू झाला. प्रथम 90 वर्षीय सुरजी देवी यांचे निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूच्या 30 मिनिटांनंतर, त्यांचे 93 वर्षीय पती दलिप सिंग यांचेही खुर्चीवर बसल्या बसल्या निधन झाले.

अंतिम यात्रा ढोल-ताशांच्या गजरात पार पडली

सुरुवातीला दलिप सिंग यांना त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबदद्ल माहिती नव्हती, पण जेव्हा त्यांना याबद्दल सांगण्यात आलं तेव्हा त्यांना फार धक्का बसला.त्या धक्क्यातच त्यांचंही निधन झालं. कुटुंबातील सदस्यांनी मृत जोडप्याला निरोप दिला. त्यांची अंतिम यात्रा ढोल-ताशांच्या गजरात पार पडली आणि मिरवणुकीला रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात देखील आलं होतं. तसेच एकाच चितेवर या जोडप्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉक्टरांनी मृत्यूची पुष्टी केली

गावकऱ्यांनी सांगितले की, सुरजी देवी आणि दलिप सिंग दोघेही वृद्धापकाळात असूनही पूर्णपणे निरोगी होते. बुधवारी सकाळी दोघेही एकत्र उठले. यानंतर, सुनेने त्यांना चहा दिला. दलिप सिंग यांनी चहा प्यायला, पण सुरजी देवींनी तो पिण्यास नकार दिला. त्यानंतर, त्या पुन्हा खाटेवर झोपल्या. जेव्हा सून पुन्हा सुरजी देवींना बघायला आली तेव्हा त्यांचा श्वास थांबला होता, त्यानंतर सुनेने कुटुंबातील इतर सदस्यांना बोलावले. यानंतर, गावातून ताबडतोब डॉक्टरांना बोलावण्यात आले, तपासणीनंतर डॉक्टरांनी सुरजी देवी यांना मृत घोषित केले.

पत्नीच्या मृत्यूची बातमी कळताच काही मिनिटांतच मृत्यू झाला

मात्र, दलिप सिंग यांना काहीच माहित नव्हते. गावकरी आणि कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. नातेवाईकांना माहिती देण्यात आली. यादरम्यान, दलिप सिंग यांच्या मुलाने त्यांना आईच्या आणि त्यांच्या पत्निच्या मृत्यूची माहिती दिली. त्यावेळी दलिप सिंग खुर्चीवर बसले होते. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकून दलिप सिंग एकमदच शांत राहिले. त्यांचा चेहरा फिका पडला आणि काही मिनिटांतच त्यांचाही मृत्यू झाला.

कुटुंबात कोण कोण आहे?

सुरजी देवी आणि दलिप सिंग यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा राजेंद्र सिंग सैन्यात होता आणि सुमारे 20 वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. धाकटा मुलगा फूल सिंग शेतकरी आहे. त्याला चार मुली आहेत ज्यांचे लग्न झाले आहे. सुरजी आणि दलिप यांच्या कुटुंबात तीन नातू आणि पणतू देखील आहेत.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.