AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओवेसीनं उच्च न्यायालयालाच निकालात काढलं; ते म्हणाले मी बोलणारच पण जरा थांबा…

हिजाब प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला आहे. भाजपने हिजाब वाद विनाकारण तापवला असल्याचे म्हटले आहे.

ओवेसीनं उच्च न्यायालयालाच निकालात काढलं; ते म्हणाले मी बोलणारच पण जरा थांबा...
ओवीसी यांचा बिकनीवर सवाल
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 13, 2022 | 5:37 PM
Share

नवी दिल्लीः हिजाब प्रकरणावर (Hiajb Issue) कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तो निर्णय योग्य नसल्याचे मत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुरुवारी व्यक्त केले. या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल असे वाटत होते मात्र पूर्ण झाली नाही असं मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र एका न्यायमूर्तीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूने आला असून उच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

हा निकाल देताना कुराणाच्या भाषेचाही गैरवापर केला असल्याचे तमत व्यक्त करत हे असे घडायला नको होते, असंही त्यांनी सांगितलं.

ओवेसी पुढे म्हणाले की, कर्नाटकातील मुस्लीम मुली हिजाब घालतात कारण कुराणातमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे. असे सांगत असतानाच अल्लाहने तिला हिजाब घालण्याचाही आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हिजाब प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला आहे. भाजपने हिजाब वाद विनाकारण तापवला असल्याचे म्हटले आहे. कारण नसताना त्यावर बंदी घातली असून याबाबतचा सगळा निकाल जाहीर होण्याची मी वाट बघतोय.त्यानंतर मी सविस्तर मत व्यक्त करणार असल्याचे म्हटले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी खंडित करणार निकाल असल्याचे म्हटले आहे. हे संवेदनशील प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवले कारण महत्वाचा निर्णय देण्यासाठी खंडपीठ स्थापन केले जाईल.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्याबाबतचा राज्य सरकारकडून आदेश कायम ठेवला होता असंही ते म्हणाले.

त्याचवेळी न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी त्याचा स्वीकार करत शेवटी निवडीचा विषय असल्याचेही त्यांनी सांगितले. हिजाब घालणे हा इस्लाममधील सक्तीच्या धार्मिक प्रथेचा भाग नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने बंदी उठवण्यास नकार दिला होता असंही त्यांनी स्पष्ट केले. न्यायमूर्ती धुलिया यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावरच आम्ही भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी शिक्षणावरच अधिक भर दिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली होती असंही त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल