AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीला चीनला भारताकडून झटका, 10 हजार कोटींचा फटका

india china business amount: भारतीय व्यापारी आधी चीनमधून सामान मागवत होते. परंतु चीनने भारताविरोधी भूमिका घेतली. सातत्याने चीनचे हे उद्योग थांबले नाही. यामुळे भारतीय लोकांनी चीनवर बहिष्कार अस्त्राचा वापर सुरु केला. यामुळे होळीला यावर्षी देशात चीन सामान देशातील बाजारपेठांमध्ये दिसले नाही.

होळीला चीनला भारताकडून झटका, 10 हजार कोटींचा फटका
| Updated on: Mar 27, 2024 | 1:32 PM
Share

यंदा होळीचा उत्सव देशभरात जोरदार साजरा केला गेला. या उत्सवात यंदा विक्रीचे सर्व विक्रम मोडले गेले. परंतु त्याचवेळी चीनला झटकाही भारताकडून दिला गेला आहे. यंदा देशात होळीच्या सामानांची विक्री 50% वाढली आहे. परंतु चीनला 10 हजार कोटींचा फटका बसला आहे. देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करत चीनी सामानांवर बहिष्कार टाकला. व्यापारी संघटना कॅटकडून (Confederation of All India Traders) देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा होळीचा व्यवसाय 50 हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे. दिल्लीत पाच हजार कोटींच्या सामानांची विक्री झाली आहे. परंतु चीन साहित्यांचा वापर कमी झाला. यामुळे चीनला 10 हजार कोटींचे नुकसान झाले.

चीनमधून येत होता माल

होळीनिमित्त पिचकारी, रंग, गुलाल चीनमधून आयात केला जात होता. त्याचा फायदा चीनला होत होता. परंतु देशातील जनतेकडून आता स्वदेशी सामान वापरले जात आहेत. स्वदेशीला मागणी वाढली. लोकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ पाठिंबा दिला. त्याचा फायदा देशातील व्यापाऱ्यांना झाला आहे. तसेच चीनचे 10 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यंदा होळीनिमित्त झालेल्या या बदलामुळे चीनला चांगल्या मिरच्या झोंबल्या आहेत.

का वाढली भारतीय वस्तूंची विक्री?

भारतीय व्यापारी आधी चीनमधून सामान मागवत होते. परंतु चीनने भारताविरोधी भूमिका घेतली. सातत्याने चीनचे हे उद्योग थांबले नाही. यामुळे भारतीय लोकांनी चीनवर बहिष्कार अस्त्राचा वापर सुरु केला. यामुळे होळीला यावर्षी देशात चीन सामान देशातील बाजारपेठांमध्ये दिसले नाही. लोकांनी देशात निर्मिती झालेल्या वस्तूंची खरेदी केली.

कोणत्या वस्तूंची सर्वाधिक विक्री

यंदा होळीला सर्वाधिक विक्री रंग, गुलाल, पिचकरी, फुगे, संगधित रंग, चंदन, पूजा सामग्रीची विक्री झाली. तसेच लोकांनी देशातच तयार करण्यात आलेल्या हर्बर रंगाना प्राधान्य दिले. ड्राय फ्रूटस, गिप्ट आयटम्स, कपडे, किराणा, खाण्यापिण्याचा वस्तू यांचा वापर यंदा जास्त झाला. होळीत झालेल्या या बदलाचा जोरदार फटका चीनला बसला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.