AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीला चीनला भारताकडून झटका, 10 हजार कोटींचा फटका

india china business amount: भारतीय व्यापारी आधी चीनमधून सामान मागवत होते. परंतु चीनने भारताविरोधी भूमिका घेतली. सातत्याने चीनचे हे उद्योग थांबले नाही. यामुळे भारतीय लोकांनी चीनवर बहिष्कार अस्त्राचा वापर सुरु केला. यामुळे होळीला यावर्षी देशात चीन सामान देशातील बाजारपेठांमध्ये दिसले नाही.

होळीला चीनला भारताकडून झटका, 10 हजार कोटींचा फटका
| Updated on: Mar 27, 2024 | 1:32 PM
Share

यंदा होळीचा उत्सव देशभरात जोरदार साजरा केला गेला. या उत्सवात यंदा विक्रीचे सर्व विक्रम मोडले गेले. परंतु त्याचवेळी चीनला झटकाही भारताकडून दिला गेला आहे. यंदा देशात होळीच्या सामानांची विक्री 50% वाढली आहे. परंतु चीनला 10 हजार कोटींचा फटका बसला आहे. देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करत चीनी सामानांवर बहिष्कार टाकला. व्यापारी संघटना कॅटकडून (Confederation of All India Traders) देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा होळीचा व्यवसाय 50 हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे. दिल्लीत पाच हजार कोटींच्या सामानांची विक्री झाली आहे. परंतु चीन साहित्यांचा वापर कमी झाला. यामुळे चीनला 10 हजार कोटींचे नुकसान झाले.

चीनमधून येत होता माल

होळीनिमित्त पिचकारी, रंग, गुलाल चीनमधून आयात केला जात होता. त्याचा फायदा चीनला होत होता. परंतु देशातील जनतेकडून आता स्वदेशी सामान वापरले जात आहेत. स्वदेशीला मागणी वाढली. लोकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ पाठिंबा दिला. त्याचा फायदा देशातील व्यापाऱ्यांना झाला आहे. तसेच चीनचे 10 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यंदा होळीनिमित्त झालेल्या या बदलामुळे चीनला चांगल्या मिरच्या झोंबल्या आहेत.

का वाढली भारतीय वस्तूंची विक्री?

भारतीय व्यापारी आधी चीनमधून सामान मागवत होते. परंतु चीनने भारताविरोधी भूमिका घेतली. सातत्याने चीनचे हे उद्योग थांबले नाही. यामुळे भारतीय लोकांनी चीनवर बहिष्कार अस्त्राचा वापर सुरु केला. यामुळे होळीला यावर्षी देशात चीन सामान देशातील बाजारपेठांमध्ये दिसले नाही. लोकांनी देशात निर्मिती झालेल्या वस्तूंची खरेदी केली.

कोणत्या वस्तूंची सर्वाधिक विक्री

यंदा होळीला सर्वाधिक विक्री रंग, गुलाल, पिचकरी, फुगे, संगधित रंग, चंदन, पूजा सामग्रीची विक्री झाली. तसेच लोकांनी देशातच तयार करण्यात आलेल्या हर्बर रंगाना प्राधान्य दिले. ड्राय फ्रूटस, गिप्ट आयटम्स, कपडे, किराणा, खाण्यापिण्याचा वस्तू यांचा वापर यंदा जास्त झाला. होळीत झालेल्या या बदलाचा जोरदार फटका चीनला बसला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.