AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेश्वर सरकार लोकांचे मन कसं ओळखतात, काय आहे राज?

बागेश्वर सरकारचा दावा आहे की, त्यांना दैवी देगणी मिळाली आहे. लोकांच्या समस्या त्यांना दैवी देणगीच्या माध्यमातूनच कळतात. बागेश्वर महाराजांच्या या शक्तीमुळे बागेश्वर धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

बागेश्वर सरकार लोकांचे मन कसं ओळखतात, काय आहे राज?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 20, 2023 | 2:40 PM
Share

रायपूर : काही बाबा, साधू वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करतात. अनेक जण आपणास दैवी देणगी मिळाल्याचे सांगतात. सध्या बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज (Bageshwar Dham)या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री (bageshwar dham sarkar) लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यांच्या दरबारात जाऊन आले की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात असलेले बागेश्वर धाम सरकार देशभर प्रसिद्ध झाले आहे. मोठ्या संख्येने लोक बागेश्वर धामच्या दरबारात जातात आणि आपल्या अडचणी व प्रश्न मांडतात.

काय आहे बागेश्वर सरकारचा यांचा दावा

बागेश्वर सरकारचा दावा आहे की, त्यांना दैवी देगणी मिळाली आहे. लोकांच्या समस्या त्यांना दैवी देणगीच्या माध्यमातूनच कळतात. बागेश्वर महाराजांच्या या शक्तीमुळे बागेश्वर धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

तज्ज्ञांच्या काय आहे दावा

बागेश्वर महाराजांना लोकांचे विचार कसे कळतात? यावर काही तज्ज्ञ दावा करतात की, ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर काही हावभाव निर्माण होतात. ते हावभाव काही लोक वाचू शकतात. ज्या पद्धतीने अंध व्यक्ती ब्रेल लिपीच्या मदतीने वाचू शकतात. तसे लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू शकणारे लोक आहेत. हातवारे आणि शारीरिक प्रयत्नांव्यतिरिक्त, समोरच्या व्यक्तीचे वर्तन कसे आहे. यासोबतच त्याची बोलण्याची पद्धत काय आहे, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.

महाराज अनेक विधाने करतात

बागेश्वर सरकार अनेकदा हिंदूंना जागृत करण्याची भाषा करतात. मोठ्या मुद्द्यांवरही ते आपली विधाने करतात. बागेश्वर महाराज म्हणतात की, मी माझ्या कुटुंबासाठी काम करत नसून लोकांना जागृत करण्यासाठी करत आहे. धर्मांतराच्या विरोधात मी लोकांना जागृत करण्याचे काम करत आहे.

श्याम मानव यांचे आवाहन

आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा बागेश्वर बाबांनी केला आहे. बागेश्वर बाबांच्या या आव्हानाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि 30 लाख रुपये घेऊन जावे, असं आव्हानच श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना दिलं आहे. हे आव्हान दिल्यानंतर बागेश्वर बाबाही इरेला पेटले आहेत. त्यांनीही श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं आहे. मी चमत्कार सिद्ध करण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या, असं आव्हानच बागेश्वर बाबांनी दिलं आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.