AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू-बौद्धांच्या लक्षद्वीपाचं कसं झालं इस्लामीकरण, इतिहास काय सांगतो?

लक्षद्वीप हा छोट्या बेटांचा समुह जगापासून दुर्लक्षित होता. या बेटावर 64 हजार लोकसंख्येपैकी 62 हजार लोकसंख्या मुस्लीम आहे. परंतू ही बेटे पूर्वी मुस्लीम बहुल नव्हती. येथे हिंदू आणि बौद्ध धर्माचे अनुयायी रहात होते. काय आहे लक्षद्वीपचा इतिहास जाणून घ्या...

हिंदू-बौद्धांच्या लक्षद्वीपाचं कसं झालं इस्लामीकरण, इतिहास काय सांगतो?
LakshadweepImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 08, 2024 | 4:25 PM
Share

मुंबई | 8 जानेवारी 2024 : लक्षद्वीप सध्या गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे डेस्टीनेशन ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौरा आणि शेजारी देश मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांवर अपमानास्पद टीपण्णी यानंतर सोशल मिडीयावर लक्षद्वीप सर्वाधिक सर्च केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावरील टीपण्णी नंतर मालदीवच्या मंत्र्यांच्या झालेल्या हक्कालपट्टीने तर यात भरच पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर आणि तेथील पर्यटनाला प्रोत्साहन देणारी पोस्ट सोशल मिडीयावर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मालदीवला झटका बसला आहे. यामुळे घाबरुन त्या ओघात मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेने त्यांना त्यांची पदे गमवावी लागली आहेत.

गुगलवर सर्वाधिक सर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर लक्षद्वीप हा गुगलवर सर्वाधिक सर्च होणारा किवर्ड ठरला आहे. अद्भूत नैसर्गिक सौदर्याचे वरदान असलेल्या लक्षद्वीपच्या पाहुणचाराबद्दल सोशल मिडीयावर रकानेच्या रकाने लिहीले जात आहेत. हजारो लोकांनी आपली मालदीवचा ट्रीप कॅन्सल केली आहे. सोशल मिडीयावर #BoycottMaldives हा हॅशटॅग ट्रेंड करीत आहे.

लक्षद्वीप बेटांचा इतिहास

हिंदू आणि बौद्ध लोकांची भूमि असलेल्या लक्षद्वीप बेट मुस्लीम बहुल कसे बनले ? याचा इतिहास काय ? असे मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर लक्षद्वीपाचा इतिहास जाणून घेऊ यात. लक्षद्वीप भारताचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. 32 छोट्या बेटांचा हा समुह आता 36 बेटांचा आहे. लक्षद्वीपची सध्याची राजधानी कावारत्ती ( kavaratti ) आहे. येथील 96 टक्के जनता मुस्लीम असून इस्लाम धर्म मानते. परंतू आधी हे बेट मुस्लीम बहुल नव्हते. येथे हिंदू आणि बौद्ध धर्मियांचे प्राबल्य होते.

लक्षद्वीपला कसा पोहचला इस्लाम धर्म

लक्षद्वीपला इस्लाम धर्माची सुरुवात ई.स.631मध्ये सुफी संत उबैदुल्लाह यांच्या मुळे झाली. सरकारी दस्ताऐवजानूसार लक्षद्वीपला इस्लाम धर्माचे आगमन 7 व्या शतकात ई.स. 41 हिजरीच्या आसपास झाले असावे. या द्वीपसमुहात अमिनी, कल्पेनी एंड्रोट, कावारत्ती आणि अगत्ती सर्वात जुनी बेटं आहेत. राजा चेरामन पेरुमल याने ई.स. 825 मध्ये इस्लाम धर्मा आपलासा केला. अरबांशी व्यापारा निमित्ताने झालेल्या संपर्काने येथील जनतेवर इस्लाम धर्माचा प्रभाव झाला.

1956 मध्ये लक्षद्वीप केंद्र शासित बनला

11 व्या शतकात या बेटांवर शेवटचे चौल राजांचे आणि नंतर कन्नानोरच्या राजाचे शासन होते. त्यानंतर पोतूर्गाल आणि नंतर 16 व्या शतकात येथे चिरक्कल हिंदू शासकाचे नंतर अरक्कल मुस्लीम, त्यानंतर टीपू सुल्तान आणि नंतर ब्रिटीशांनी या बेटांवर राज्य केले. साल 1947 स्वातंत्र्यानंतर 1956 भाषावार प्रांत रचनेनंतर यास भारताच्या मद्रास प्रेसीडेंसीमध्ये सामील केले. त्यानंतर त्यास केरळ राज्यात सामील केले. त्यानंतर त्यास केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. लक्षद्वीपला आधी लॅकाडिव ( Laccadive ), मिनिकॉय ( Minicoy ) , आणि अमिनदीवी ( Amindivi ) नावाने ओळखले दातक होते. 1971 नंतर त्यास लक्षद्वीप असे नाव देण्यात आले.

लक्षद्वीप पर्यटकांपासून दूर

लक्षद्वीप आणि त्याचा किनारी प्रदेश पर्यटनापासून दुर्लक्षित होता. या बेटांची बहुतांशी लोकसंख्या एकूण 36 बेटांपैकी 9-10 बेटांवरच रहाते. त्यामुळे अनेक लक्षद्वीप बेटे आणि समुद्रकिनारे जगाच्या नजरेसमोर आलेले नाहीत. पर्यटकांपासून अज्ञात आहेत. देशातील अन्य राज्यातून येथे प्रवेश करण्याआधी लक्षद्वीप पर्यटन विभागाची परवानगी घ्यावी लागते. येथे प्रवास करताना रोख व्यवहार करावे लागतात, कारण येथील अनेक भागात इंटरनेट सेवा मर्यादीत असल्याने ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येतात. येथे भारताच्या राष्ट्रपतींचे शासन चालते.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.