AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू-बौद्धांच्या लक्षद्वीपाचं कसं झालं इस्लामीकरण, इतिहास काय सांगतो?

लक्षद्वीप हा छोट्या बेटांचा समुह जगापासून दुर्लक्षित होता. या बेटावर 64 हजार लोकसंख्येपैकी 62 हजार लोकसंख्या मुस्लीम आहे. परंतू ही बेटे पूर्वी मुस्लीम बहुल नव्हती. येथे हिंदू आणि बौद्ध धर्माचे अनुयायी रहात होते. काय आहे लक्षद्वीपचा इतिहास जाणून घ्या...

हिंदू-बौद्धांच्या लक्षद्वीपाचं कसं झालं इस्लामीकरण, इतिहास काय सांगतो?
LakshadweepImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 08, 2024 | 4:25 PM
Share

मुंबई | 8 जानेवारी 2024 : लक्षद्वीप सध्या गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे डेस्टीनेशन ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौरा आणि शेजारी देश मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांवर अपमानास्पद टीपण्णी यानंतर सोशल मिडीयावर लक्षद्वीप सर्वाधिक सर्च केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावरील टीपण्णी नंतर मालदीवच्या मंत्र्यांच्या झालेल्या हक्कालपट्टीने तर यात भरच पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर आणि तेथील पर्यटनाला प्रोत्साहन देणारी पोस्ट सोशल मिडीयावर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मालदीवला झटका बसला आहे. यामुळे घाबरुन त्या ओघात मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेने त्यांना त्यांची पदे गमवावी लागली आहेत.

गुगलवर सर्वाधिक सर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर लक्षद्वीप हा गुगलवर सर्वाधिक सर्च होणारा किवर्ड ठरला आहे. अद्भूत नैसर्गिक सौदर्याचे वरदान असलेल्या लक्षद्वीपच्या पाहुणचाराबद्दल सोशल मिडीयावर रकानेच्या रकाने लिहीले जात आहेत. हजारो लोकांनी आपली मालदीवचा ट्रीप कॅन्सल केली आहे. सोशल मिडीयावर #BoycottMaldives हा हॅशटॅग ट्रेंड करीत आहे.

लक्षद्वीप बेटांचा इतिहास

हिंदू आणि बौद्ध लोकांची भूमि असलेल्या लक्षद्वीप बेट मुस्लीम बहुल कसे बनले ? याचा इतिहास काय ? असे मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर लक्षद्वीपाचा इतिहास जाणून घेऊ यात. लक्षद्वीप भारताचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. 32 छोट्या बेटांचा हा समुह आता 36 बेटांचा आहे. लक्षद्वीपची सध्याची राजधानी कावारत्ती ( kavaratti ) आहे. येथील 96 टक्के जनता मुस्लीम असून इस्लाम धर्म मानते. परंतू आधी हे बेट मुस्लीम बहुल नव्हते. येथे हिंदू आणि बौद्ध धर्मियांचे प्राबल्य होते.

लक्षद्वीपला कसा पोहचला इस्लाम धर्म

लक्षद्वीपला इस्लाम धर्माची सुरुवात ई.स.631मध्ये सुफी संत उबैदुल्लाह यांच्या मुळे झाली. सरकारी दस्ताऐवजानूसार लक्षद्वीपला इस्लाम धर्माचे आगमन 7 व्या शतकात ई.स. 41 हिजरीच्या आसपास झाले असावे. या द्वीपसमुहात अमिनी, कल्पेनी एंड्रोट, कावारत्ती आणि अगत्ती सर्वात जुनी बेटं आहेत. राजा चेरामन पेरुमल याने ई.स. 825 मध्ये इस्लाम धर्मा आपलासा केला. अरबांशी व्यापारा निमित्ताने झालेल्या संपर्काने येथील जनतेवर इस्लाम धर्माचा प्रभाव झाला.

1956 मध्ये लक्षद्वीप केंद्र शासित बनला

11 व्या शतकात या बेटांवर शेवटचे चौल राजांचे आणि नंतर कन्नानोरच्या राजाचे शासन होते. त्यानंतर पोतूर्गाल आणि नंतर 16 व्या शतकात येथे चिरक्कल हिंदू शासकाचे नंतर अरक्कल मुस्लीम, त्यानंतर टीपू सुल्तान आणि नंतर ब्रिटीशांनी या बेटांवर राज्य केले. साल 1947 स्वातंत्र्यानंतर 1956 भाषावार प्रांत रचनेनंतर यास भारताच्या मद्रास प्रेसीडेंसीमध्ये सामील केले. त्यानंतर त्यास केरळ राज्यात सामील केले. त्यानंतर त्यास केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. लक्षद्वीपला आधी लॅकाडिव ( Laccadive ), मिनिकॉय ( Minicoy ) , आणि अमिनदीवी ( Amindivi ) नावाने ओळखले दातक होते. 1971 नंतर त्यास लक्षद्वीप असे नाव देण्यात आले.

लक्षद्वीप पर्यटकांपासून दूर

लक्षद्वीप आणि त्याचा किनारी प्रदेश पर्यटनापासून दुर्लक्षित होता. या बेटांची बहुतांशी लोकसंख्या एकूण 36 बेटांपैकी 9-10 बेटांवरच रहाते. त्यामुळे अनेक लक्षद्वीप बेटे आणि समुद्रकिनारे जगाच्या नजरेसमोर आलेले नाहीत. पर्यटकांपासून अज्ञात आहेत. देशातील अन्य राज्यातून येथे प्रवेश करण्याआधी लक्षद्वीप पर्यटन विभागाची परवानगी घ्यावी लागते. येथे प्रवास करताना रोख व्यवहार करावे लागतात, कारण येथील अनेक भागात इंटरनेट सेवा मर्यादीत असल्याने ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येतात. येथे भारताच्या राष्ट्रपतींचे शासन चालते.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.