AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील, तर एकमेकांना सोडलेलं बरं : सुप्रीम कोर्ट

एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत नोंदवलं. 1995 मध्ये विवाहबद्ध झालेलं दाम्पत्य केवळ पाच दिवस सोबत राहिले होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट म्हणालं, जर पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी सेपरेट झालेलंच बरं. महत्त्वाचं म्हणजे नवरा बायकोचं वय हे 50 आणि 55 वर्ष आहे.

पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील, तर एकमेकांना सोडलेलं बरं : सुप्रीम कोर्ट
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या तीन याचिकांवर आज सुनावणी
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 04, 2021 | 9:47 AM
Share

नवी दिल्ली : जर नवरा-बायको (Married Couple) सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी एकमेकांना सोडलेलंच बरं, अशी टिपणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिली. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत नोंदवलं. 1995 मध्ये विवाहबद्ध झालेलं दाम्पत्य केवळ पाच दिवस सोबत राहिले होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट म्हणालं, जर पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी सेपरेट झालेलंच बरं. महत्त्वाचं म्हणजे नवरा बायकोचं वय हे 50 आणि 55 वर्ष आहे.

पत्नीने हायकोर्टाने जारी केलेल्या घटस्फोटाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्ट म्हणालं, तुम्हाला व्यावहारिक व्हावं लागेल, आयुष्यभर केवळ कोर्टाची लढाई लढत राहणं योग्य नाही.

पोटगीचा निर्णय

हायकोर्टाने चुकीच्या पद्धतीने घटस्फोटाला मंजुरी दिली होती, असं महिलेने सुप्रीम कोर्टात सांगितलं. हायकोर्टाने परस्पर सहमतीकडे दुर्लक्ष केल्याचं महिलेने म्हटलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पोटगीबाबतचा निर्णय परस्पर संमतीने घेण्याच्या सूचना केल्या.

दुसरीकडे पतीनेही कोर्टासमोर आपली बाजू मांडली. “आम्ही केवळ 5-6 दिवसच एकत्र राहिलो, लग्न केलं तेव्हापासूनच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. हायकोर्टाचा निर्णय योग्य होता, मला पत्नीसोबत राहायचं नाही. मी तिला पोटगीही देण्यासाठी तयार आहे”, असं पतीने कोर्टाला सांगितलं.

घरजावई होण्याचा हट्ट

पतीच्या वकिलाने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार, त्यांचं लग्न 13 जुलै 1995 रोजी झालं. त्यानंतर पत्नीने पतीला आपल्यासोबत घरजावई बनण्याचा हट्ट धरला. आपण सधन कुटुंबातील आहोत, त्यामुळे माझ्या घरीच राहू असा आग्रह पत्नीने पतीकडे केला. महत्त्वाचं म्हणजे या महिलेचे वडील IAS अधिकारी होते. पतीने आपली मागणी मान्य न केल्याने ती त्याला सोडून माहेरी आली. तेव्हापासून दोघांमध्ये कोर्टात लढाई सुरु आहे. आता डिसेंबर महिन्यात पुढील सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या 

Aryan Khan | शाहरुखच्या पोराची कोठडी संपणार, पुढे काय काय घडणार?

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश