AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Jammu Kasmir Visit : जम्मू आणि काश्मीरची जनता पंचायती राजपासून वंचित होती, अनुच्छेद ३७० हटवून तुम्हाला ताकद दिली

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे कलम 370 रद्द केल्यानंतर आज तीन वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) भेट देत आहेत. जम्मूतील सांबा जिल्ह्यात (Samba district) होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी 20 हजार कोटींहून अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. तर त्याचबरोबर पंतप्रधान मोदी […]

PM Modi Jammu Kasmir Visit : जम्मू आणि काश्मीरची जनता पंचायती राजपासून वंचित होती, अनुच्छेद ३७० हटवून तुम्हाला ताकद दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9
| Updated on: Apr 24, 2022 | 3:22 PM
Share

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे कलम 370 रद्द केल्यानंतर आज तीन वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) भेट देत आहेत. जम्मूतील सांबा जिल्ह्यात (Samba district) होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी 20 हजार कोटींहून अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. तर त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बनिहाल-काजीगुंड बोगद्याचे (tunnel) उद्घाटनही केले. ज्यामुळे जम्मू-काश्मीरचा विविध क्षेत्राशी संपर्क वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रे-वे आणि दोन जलविद्युत प्रकल्पांचे शिलावरण ही केले आहे.

विकासाचा संदेश घेऊन येथे आलो

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले मी, विकासाचा संदेश घेऊन येथे आलो आहे. जम्मू-काश्मीरमधील विकासाला गती देण्यासाठी आज 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी 3100 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याचे उद्घाटन केले. या 8.45 किमी लांबीच्या बोगद्यामुळे बनिहाल ते काझीगुंड दरम्यानचे अंतर 16 किमीपर्यंत कमी होईल. आणि प्रवासाचा वेळ सुमारे दीड तासांनी कमी होणार आहे.

पंचायती राज दिन

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीरच्या विकासाला नवी गती देण्यासाठी राज्यात वेगाने काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तर कलम 370 रद्द केल्यानंतर आज अनेक कुटुंबांना त्यांच्या गावातील घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे. तर या वर्षीचा पंचायती राज दिन, जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जात आहे, तो एक मोठा बदल दर्शवित असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचली असल्यानेच इथून मी देशभरातील पंचायतींशी संवाद साधत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.

अंतर दूर करणे

याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा मी एक भारत, श्रेष्ठ भारत बद्दल बोलतो तेव्हा आमचे लक्ष कनेक्टिव्हिटीवर असते. तसेच अंतर कमी करण्यावरही असते. मग ते हृदय, भाषा, वागणूक किंवा संसाधने असोत. अंतर दूर करणे हे आज आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. तर गावच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये पंचायतीची भूमिका अधिक असावी, असा शासनाचा प्रयत्न आहे. यासह पंचायत ही राष्ट्रीय संकल्पांच्या पूर्ततेतील महत्त्वाचा दुवा म्हणून उदयास येईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

इतर बातम्या :

BJP MP Sakshi Maharaj : ‘पोलीस वाचवायला येणार नाहीत, घरात बाण ठेवा’, भाजप खासदार साक्षी महाराजांनी सुचवले ‘सुरक्षेचे उपाय’

ड्रायव्हरची तलप, प्रवाश्यांना त्रास, चहा पिण्यासाठी चक्क ट्रेन थांबवली!

Mann Ki Baat : ‘पंतप्रधान संग्रहालय’ ही अभिमानाची बाब, पंतप्रधान मोदींनी विचारले देशभरातील संग्रहालयांशी संबंधित 7 प्रश्न

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.