Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : …तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi : ...तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा
Rahul Gandhi Narendra Modi
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 10:06 PM

लोकसभा निवडणुका पार पडल्या असून एनडीए सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंडिया आघाडीने भाजपला सत्तेत येण्यापासून रोखलं, मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेत भाजपने एनडीए सरकार स्थापन केलं. भाजपलाही काही राज्यात कमी प्रमाणात मतदान झालं. मोदी स्वत: एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. याचाच धागा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

प्रियंका गांधी वाराणसीत लढल्या असत्या तर आज भारताच्या पंतप्रधानांचा वाराणसी निवडणुकीत दोन-तीन लाख मतांनी पराभव झाला असता. मी हे अहंकारातून बोलत नाही, कारण भारतातील जनतेने पंतप्रधानांना संदेश दिला आहे की तुमचे राजकारण आम्हाला आवडले नाही आणि आम्ही विरोधात आहोत. आम्ही द्वेषाच्या, हिंसेच्या विरोधात आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि सदस्य आणि अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेचे आभार मानू इच्छितो. यावेळी काँग्रेस पक्ष अमेठी, रायबरेली, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात एकदिलाने लढला.तुम्ही संपूर्ण देशाचे राजकारणच बदलून टाकले आहे. संविधानाला हात लावला तर बघा जनता काय करतील, असा संदेश जनतेने देशाच्या पंतप्रधानांना दिला असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी विजय मिळवला. रायबरेली मतदारसंघात त्यांनी सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी म्हणाले.

नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या.
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत...
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत....
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?.
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा.
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन.
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट.
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'.