AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शक्ती असेल तर जगाला प्रेमाची भाषा कळते…,’ भारत-पाक तणावादरम्यान RSS प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्य

जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगिलते की प्रेमाची भाषा जगाला तेव्हाच ऐकू येते जेव्हा तुमच्याकडे शक्ती असेल. भारताची प्राचीन संस्कृती, त्यागाची परंपरा आणि विश्व कल्याणासाठी या शक्तीची गरज असल्याचेही ते म्हणाले.

'शक्ती असेल तर जगाला प्रेमाची भाषा कळते...,' भारत-पाक तणावादरम्यान RSS प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्य
mohan bhagwat
| Updated on: May 17, 2025 | 5:31 PM
Share

भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत यांचे एक महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. जयपूरातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की आपल्या ताकद असेल तर जगाला आपण प्रेमाची भाषेत सांगू शकतो, समजावू शकतो. शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषा देखील समजते असेही ते म्हणाले.त्यांनी आपल्या भाषणात भारताची प्राचीन संस्कृती आणि त्यागाच्या परंपरेला उजाळा दिला.ते पुढे म्हणाले की भारताच्या इतिहासात भगवान श्री रामापासून भामाशाह यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वांनी त्याग आणि सेवेचे नवा इतिहास घडवला आहे.

मोहन भागवत पुढे म्हणाले की जगाला धर्माची शिकवण देणे भारताचे कर्तव्य आहे. धर्माच्या आधारेच मानवतेचे उन्नती शक्य आहे. त्यांनी हिंदू धर्माबद्दल माहिती देताना सांगितले की विश्वकल्याण हाच आमचा प्रमुख धर्म आहे. त्यांनी भारता देशाला सर्वात प्राचीन असल्याचे सांगत भारताची भूमिका मोठ्या भावासारखी असल्याचे सांगितले.

विश्वात शांती आणि सौहार्द कायम राहण्यासाठी कार्यरत!

भारत जगात शांती आणि सौहार्द कायम राखण्याच्या दिशेने निरंतर कार्यरत आहे. भारत कोणाचा द्वेष ठेवत नाही. परंतू जर आपल्याकडे शक्ती नसेल तर हे जग प्रेमाची आणि मांगल्य, सौहार्दाची भाषा समजत नाही. त्यामुळे या जगाचे कल्याण करण्यासाठी देखील आपल्याकडे शक्ती असणे आवश्यक आहे. आणि भारताची ताकद जगाने पाहीली आहे असेही मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.

शक्ती हेच एक माध्यम आहे!

मोहन भागवत पुढे असेही म्हणाले की शक्ती हेच ते माध्यम आहे. ज्यामुळे जगात भारत आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकतो. आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार आपण तेव्हाच करु शकू जेव्हा आपल्याकडे ताकद असेल, ही जगाची रितच आहे तिला आपण बदलू शकत नाही असे आपण आधीच सांगितले आहे. यावेळी त्यांनी संत समाजाची भूमिकेची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की संत आणि ऋषीमुनी परंपरा राबवून संस्कृती आणि धर्माचे रक्षण करत आहेत.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा