‘ऑगस्टपासून दररोज 1 कोटी लोकांचं लसीकरण होणार, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार’, ICMR चा दावा

आयसीएमआरने ऑगस्टपासून भारतात 1 कोटी नागरिकांचं लसीकरण करून डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार असल्याचा दावा केलाय.

‘ऑगस्टपासून दररोज 1 कोटी लोकांचं लसीकरण होणार, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार’, ICMR चा दावा
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 8:20 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाच्या आकड्यांमध्ये आता घट होताना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही तितकाच आहे. त्यामुळेच वेगाने कोरोना लसीकरण होणं हाच एकमेवर पर्याय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र, मागील अनेक दिवसांपासून भारतातील लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. आता आयसीएमआरने ऑगस्टपासून भारतात 1 कोटी नागरिकांचं लसीकरण करून डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार असल्याचा दावा केलाय. त्यामुळे लवकरच पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे (IMCR claim 1 crore Corona vaccine dose per day from August 2021).

आयसीएमआरने (ICMR) दावा केला, “देशात लसींचा तुटवडा नाही. जुलै-ऑगस्टच्या मध्यापर्यंत दररोज एक कोटी लोकांचं लसीकरण करण्यासाठी लसी उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस दिली जाईल.”

आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल म्हणाले, “देशात आतापर्यंत एकूण 21.60 कोटी कोरोना लसी देण्यात आल्यात. यात 1.67 कोटी डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना, 2.42 कोटी डोस फ्रंटलाईन वर्कर्सला, 15.48 कोटी डोस 45 वर्षांवरील नागरिकांना आणि 2.03 कोटी डोस 18-44 वर्षे वयोगटातील नागरिकांना देण्यात आलेत.” सरकारने लसींची उपलब्धता वाढवणार असल्याचा दावा केला असला तरी कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरात मी करण्याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कोव्हिशील्डचे दोनच डोस दिले जाणार आहेत. पहिल्या डोसनंतर 12 आठवड्यांनी दुसरा डोस दिला जाणार आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांहून अधिक घट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोरोना रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांहून अधिक घट झाल्याचं सांगितलंय. एका दिवसात कोरोनाच्या सक्रीय कोरोना रुग्णांमध्ये 1.3 लाख रुग्णांची घट झालीय. दुसरीकडे 30 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही सातत्याने कोरोना रुग्ण कमी होत आहेत. मागील 24 तासात 1 लाख 27 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. 28 मे रोजी देशात एकूण 2 लाखपेक्षा कमी रुग्णांची नोंद झालीय. आता कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधित होणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. दर आठवड्याला सरासरी 20 लाख चाचण्या केल्या जात आहेत.

बरे होणाऱ्यांचं प्रमाण (recovery rate) 92 टक्के

आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी लव अग्रवाल म्हणाले, “1 जून रोजी सक्रीय रुग्णांची संख्या घटून 18.9 लाखपर्यंत पोहचलीय. 10 मे रोजी ही संख्या 37 लाख इतकी होती. रिकव्हरी रेट वाढून तो आता 92 टक्के झालाय.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राल पत्र

सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, मग केंद्राची परवानगी का नाही? काँग्रेसचा सवाल

Covid-19 : लसीचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी करा या टिप्स फॉलो, कोणतीही अडचण येणार नाही

व्हिडीओ पाहा :

IMCR claim 1 crore Corona vaccine dose per day from August 2021

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.