AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलश यात्रेसाठी जल भरण्यासाठी चाललेल्या भाविकांचा ट्रॅक्टर नदीत कोसळला, अपघातात 20 हून अधिक भाविकांचा मृत्यू

कलश यात्रेसाठी नदीवर जल भरण्यासाठी सर्व भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून चालले होते. यावेळी गर्रा नदीवरील पुलावर येताच ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् एकच हाहाकार उडाला.

कलश यात्रेसाठी जल भरण्यासाठी चाललेल्या भाविकांचा ट्रॅक्टर नदीत कोसळला, अपघातात 20 हून अधिक भाविकांचा मृत्यू
भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळलीImage Credit source: TV9
| Updated on: Apr 15, 2023 | 4:46 PM
Share

शाहजहापूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे शनिवारी भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. पुलाचे रेलिंग तोडून ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पडली. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भाविक गर्रा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. शाहजहापूरच्या तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळील राता पुलावर हा अपघात झाला. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम अपघातस्थळी पोहोचली आहे. बचावकार्य सुरू आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ‘ज्या भक्तांचे प्राण गेले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत’, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हटले आहे.

कलश यात्रेसाठी जल भरण्यासाठी चालले होते

रविवारपासून तिल्हार परिसरातील सुनौरा अजमतपूर गावात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी कलश यात्रा काढण्यात येणार होती. यासाठी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून महिला आणि पुरुष बिरसिंगपूर परिसरातील गर्रा नदीकडे निघाले होते. पुलावर येताच वेग जास्त असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन रेलिंग तोडून नदीत पडली. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 40 हून अधिक लोक प्रवास करत होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.