AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Oil Crisis : अखेर व्हायचं तेच झालं, भारताचा गुपचूप प्लॅन बी अ‍ॅक्टिव्ह….तेल टंंचाईवर सर्वात मोठा निर्णय!

इराण-इस्रायल युद्धामुळे जगात तेलसंकट निर्माण झाले आहे. भारतालाही त्याचा फटका बसतो आहे. दरम्यान तेलटंचाई भासू नये यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आपला प्लॅन बी अॅक्टिव्ह केला आहे.

Indian Oil Crisis : अखेर व्हायचं तेच झालं, भारताचा गुपचूप प्लॅन बी अ‍ॅक्टिव्ह....तेल टंंचाईवर सर्वात मोठा निर्णय!
indian oil crisisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 3:17 PM
Share

India Oil Crysis : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता चांगलेच भीषण रुप झाले आहे. गेल्या 22 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग उर्जा संकटाच्या खाईत लोटलं गेलंय. पाकिस्तानात महागाई वाढली आहे. या युद्धाचा फटका पश्चिम आशियातील अनेक देशांना बसत आहे. दुसरीकडे भारतातही इंधन तुटवडा निर्माण होतोय. गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. अशीच स्थिती भविष्यातही कायम राहिली तर भारतात पेट्रोल, डिझेलचीही किंमत वाढण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आता भारताने आपला प्लॅन बी अॅक्टिव्ह केला आहे. काहीही झालं तरी भारतात इंधन टंचाई भासणार नाही, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे.

भारत सरकार नेमकी काय खबरदार घेत आहे?

इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेले उर्जासंकट परतवून लावण्यासाठी भारताकडून काही खबरदारी घेण्यात येत आहे. भारताने इतर उपायोजनांचा अवलंब करणे सुरू केले आहे. भारताने पर्यायी आयात व्यवस्था सक्रीय केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल मागवत आहे. अॅक्वा टायटन नावाचे रशियन जहाज तब्बल 7.7 लाख बॅरल कच्चे तेल घेऊन भारतात येत आहे. या कच्च्या तेलामुळे भारतात उर्जा संकट बऱ्यापैकी कमी होणार आहे. दुसरीकडे 18 मार्च रोजीच जग लाडकी नावाचे तेल घेऊन येणारे जहाज मुंद्रा पोर्टवर आलेले आहे. गेल्या 22 दिवसांत भारताने तेलाचे चार मोठे जहाज आणले आहेत. या जहाजांत नैसर्गिक वायू आणि तेल आहे.

भारताकडे पुरेसा तेलसाठा

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली असली तरी भारत आता अन्य वेगवेगळ्या मार्गांनी कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायुंचा पुरवठा करत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी भविष्यात इंधन तुटवडा होऊ देणार नाही, असे आश्वासन प्रेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारताला प्रतिदिन 55 लाख बॅरल तेल लागते. भारताकडे तेलाचा पुरेसा साठा आहे, असे केंद्राने सांगितले.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक