AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 : तुमचंही ऊर अभिमानाने भरून येईल असा मेसेज थेट चंद्राहून; चंद्रावर पाऊल ठेवताच लँडरचा पहिला मेसेज काय?

अखेर भारताचं मिशन मून यशस्वी झालं आहे. भारताच्या चांद्रयान -3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. चंद्रावर पाऊल ठेवताच विक्रम लँडरने तिथून काही फोटो पाठवले आहेत. तसेच एक मेसेजही पाठवला आहे.

Chandrayaan-3 : तुमचंही ऊर अभिमानाने भरून येईल असा मेसेज थेट चंद्राहून; चंद्रावर पाऊल ठेवताच लँडरचा पहिला मेसेज काय?
Chandrayaan-3Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2023 | 6:38 AM
Share

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : भारताचं मिशन मून यशस्वी झालं आहे. चांद्रयान -3 यशस्वीपणे चंद्रावर उतरलं आहे. काल म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी यानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं. चंद्रावर उतरताच चांद्रयान-3च्या लँडरने संदेश पाठवला आहे. भारत, मी चंद्रावर पोहोचलो आहे. आणि तुम्ही सुद्धा, असा संदेश विक्रम लँडरने पाठवला आहे. इस्रोने ट्विट करून ही माहिती दिली आहे. बुधवारी भारताने अंतराळात एक इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानमधून लैस एलएमची सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळालं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.

भारतीय वेळेनुसार काल संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयानने चंद्राच्या पृष्ठभूमीवर पाऊल ठेवलं. त्यामुळे भारत हा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत जगातील चार देशच चंद्रावर पोहोचू शकले आहेत. त्यात चीन, अमेरिका, रशिया आणि आता भारताचा नंबर आहे. भारताच्या या मिशन मूनमुळे केवळ भारतालाच नव्हे तर जगाला एक दिशा मिळणार आहे. चंद्रावरील वातावरणाचा संपूर्ण जगाला अभ्यास करता येणार आहे.

अन् एकच जल्लोष झाला

भारताने चंद्रावर पाऊल ठेवणं हा अंतराळ क्रांतीचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणं हे एक आव्हान होतं. भारताने हे आव्हान पेललं आहे. दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा अनेक देशांनी प्रयत्न केला. पण यश फक्त भारतालाच मिळालं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोमध्ये एकच जल्लोष झाला. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांनी तिथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशवासियांना शुभेच्छा दिल्या. शास्त्रज्ञांच्या कष्टांना सलाम केला.

आता सूर्य आणि शुक्रावर स्वारी

भारताने पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर जाऊन हा संकल्प पूर्ण केला आहे. भारत आता चंद्रावर पोहोचला आहे. हे यश संपूर्ण मानवतेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता आपण चंद्रापाठोपाठ सूर्यावरही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय शुक्रावरही आपण जाऊन संशोधन करणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.