AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, सरकारचा मोठा निर्णय, 15 मे पर्यंत…

India Pakistan War: भारत - पाकिस्तान मध्ये तणावग्रस्त वातावरण, पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, सुरक्षेच्या कारणास्तव, भारत सरकारने घेतला मोठा निर्णय, 15 मे पर्यंत...

India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, सरकारचा मोठा निर्णय, 15 मे पर्यंत...
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: May 10, 2025 | 9:26 AM
Share

India Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर भारताना ‘ऑपरेशन सिंदूर राबवलं’ पाकिस्तानचा बदला घेतला. पण दशहतवाद्यांच्या मृत्यूनंतर बिधरलेल्या पाकिस्तानने कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. पाकिस्तान आता भारताच्या सीमावर्ती भागांना लक्ष्य करत हल्ले करत आहे. पण भारताकडून पाकिस्तानचे सर्व प्रयत्न मोडून काढले जात आहे. देशात सध्या तणावग्रस्त वातावरण असताना भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारने 15 मे सकाळी 5:29 वाजेपर्यंत उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळांवर नागरी उड्डाणे स्थगित केली आहेत. यापूर्वी, सरकारने पाकिस्तानी सीमेवर आणि आजूबाजूला असलेली 25 विमानतळे शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर जाणून घ्या कोण-कोणते विमानतळं 15 मेपर्यंत बंद राहतील.

हे सुद्धा वाचा : काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर, आज अधिकाऱ्याचा मृत्यू, काश्मीरमधील भीषण वास्तव

सरकारच्या निर्णयानंतर उत्तर भारतातील श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, धर्मशाला, सिमला, पटियाला, लुधियाना, पठाणकोट, अंबाला, भटिंडा आणि पश्चिम भारतातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, उत्तरलाई, किशनगड, राजकोट, जामनगर, भुज, कांडला, मुंद्रा, पोरबंदर विमानतळं बंद राहतील. शिवाय गाझियाबादमधील हिंडन विमानतळ बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दररोज 400 उड्डाणे रद्द

पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशात दररोज 400 हून अधिक उड्डाणे रद्द केली जात आहेत. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, 165 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एवढंच नाही तर, एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा यासह सर्व विमान कंपन्या उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना परतफेड करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 5 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) एकूण 138 उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीचे आयजीआय विमानतळ सध्या उत्तर भारतातील एकमेव प्रमुख विमानतळ आहे जे कार्यरत आहे. डेहराडून, लखनऊ आणि जयपूर सारख्या जवळच्या काही शहरांचे विमानतळ सध्या सुरु आहेत.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....