AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Bharat | ‘तुम्हाला झाकाव लागतय, कारण लोक तुमचं….’, संजय राऊत यांनी वापरले बोचरे शब्द

India vs Bharat | "यांनी नया भारत निर्माण करण्याची गोष्ट केली होती. तुम्ही कोणत्या ग्रहावर, चांद्रयानात बसून वरुन काम करताय का?" अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला. संजय राऊत यांनी अत्यंत बोचणाऱ्या, टोचणाऱ्या शब्दात टीका केली.

India vs Bharat | 'तुम्हाला झाकाव लागतय, कारण लोक तुमचं....', संजय राऊत यांनी वापरले बोचरे शब्द
Image Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Sep 06, 2023 | 10:02 AM
Share

नवी दिल्ली : “सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे?. अनन्यसाधारण परिस्थितीत अधिवेशन बोलावलं जातं. हे निमंत्रण बारश्याचं आहे का? लग्नाचं आहे का? मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय? भाजपचा निरोप समारंभ आहे. नक्की काय अजेंडा आहे. हे काय सुरू आहे देशात?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. “तुम्ही संसदेच विशेष अधिवेश बोलवलय. तुम्ही तुमचा कार्यक्रम का लपवता? एवढ देशात गोपनीय काय चाललय? ही कोणती हुकूमशाही आहे. संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम सांगितला जात नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. याविषयी आवाज उठवायचा आहे. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे, हे मुद्दे आम्ही मांडू शकतो की, नाही?” असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला.

“एक देश-एक निवडणूक हा एक घोटाळा आहे. या सरकारने मागच्या आठ-नऊ वर्षात घोटाळे केले. त्यातला हा एक घोटाळा आहे. देश लुटण्याचा, देशाला खड्ड्यात घालण्याचा हा एक प्रकार आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली. “आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून इंडिया शब्दाच भय वाटू लागलय. देशातील एका सरकारला घटनेतील नावाच भय वाटणं हे विचित्र आहे. घटनेत भारत सुद्धा नाव आहे. या देशातल्या विरोधीपक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केलीय. म्हणून इंडिया नाव मिटवणं हा डरपोकपणा, विकृतपणा आहे. यांनी नया भारत निर्माण करण्याची गोष्ट केली होती. तुम्ही कोणत्या ग्रहावर, चांद्रयानात बसून वरुन काम करताय का? इंडिया नाव राहील, इंडिया आहे आणि भविष्यात इंडिया सत्तेवर येईल” असं संजय राऊत म्हणाले.

’10 वर्षात देश एक इंचही पुढे गेलेला नाही’

“मुंबईत G20 ची बैठक झाली, त्यावेळी सुद्धा पडदे लावले होते. सांताक्रूझ विमानतळाच्या पुढचा भाग झाकावा लागला होता. तुम्हाला झाकाव लागतय, कारण लोक तुमच वाकून बघतायत. 10 वर्षात देश एक इंचही पुढे गेलेला नाही. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे मुद्दे तसेच आहेत. इंडिया नाव बदलून लपवालपवी चालणार नाही” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?