AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Indian Government said drinking warm water does not kill corona virus).

मोठी बातमी ! गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
पाणी आरोग्यासाठी चांगलेच, मात्र दिवसभरात किती ग्लास पाणी प्यायचे?
| Updated on: May 08, 2021 | 7:28 PM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा थैमान सुरु आहे. भारतात शुक्रवारी (7 एप्रिल) 4 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यासह संपूर्ण देश आज कोरोना संकटाच्या या भयावह आगीत होरपळतोय. अशा परिस्थितीत काहीजण गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहेत. गरम पाणी पिल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Indian Government said drinking warm water does not kill corona virus).

केंद्र सरकारने नेमकं काय म्हटलंय?

केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “गरम पाणी प्यालाने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये”, असं केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे (Indian Government said drinking warm water does not kill corona virus),

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या माहितीच्या बळी पडू नका

सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर कुठे घरात बसून पान खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना संबंधित अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण या सगळ्या अफवा आहेत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा देणारा व्हायरल मेसेज खोटा

सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करुन चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं देखील समोर आलं आहे. भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असून 10 मे पर्यंत देशात 50 हजार मृत्यू होणार असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, अशी खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मेसेजवरही केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक टीमने स्पष्टीकरण दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशाप्रकारची कोणतीही सूचना दिलेली नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.

हेही वाचा : जिल्ह्याच्या सीमा बंद, नियम मोडणाऱ्यांना 14 दिवस डांबून ठेवणार, तिसऱ्या लाटेसाठी नागपूर रोल मॉडेल ठरणार ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.