AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाणबुडीतून डागले अण्वस्र क्षमतेचे बॅलेस्टीक मिसाईल, का केली गुप्त चाचणी पाहा

भारतीय नौदल आणि डीआरडीओने समुद्रात सिक्रेट मिसाईट टेस्ट केली आहे. पाणबुडीवरुन डागता येणाऱ्या अण्वस्रवाहू बॅलेस्टिक मिसाईल K-4 ची यशस्वी चाचणी करण्यात भारताला यश आले आहे.

भारताने पाणबुडीतून डागले अण्वस्र क्षमतेचे बॅलेस्टीक मिसाईल, का केली गुप्त चाचणी पाहा
Submarine-Launched Ballistic Missile
| Updated on: Nov 28, 2024 | 12:27 PM
Share

भारतीय नौदलाने न्युक्लीअर पॉवर पाणबुडी ‘अरिघात’ वरुन प्रथमच अण्वस्र क्षमतेचे बॅलेस्टीक मिसाईल ( K-4 SLBM ) यशस्वी चाचणी केली आहे.या अण्वस्रवाहू बॅलेस्टीक मिसाईलची रेंजर 3,500 किमी आहे. या मिसाईलची खास बाब म्हणजे ही देशाला सेंकड स्ट्राईकची क्षमता देते. म्हणजे देशाच्या न्युक्लीअर हल्ल्याला ताकद देणारी ही मिसाईल आहे.जर जमीनीवरुन हल्ला करण्यासारखी परिस्थिती नसेल तर पाण्याच्या शत्रू देशावर अण्वस्र हल्ला करण्याची या मिसाईलची क्षमता आहे.

K-4 SLBM ही मिसाईल इंटरमिडीयट रेंजची सबमरीनवरुन लॉंच होणारी अण्वस्र वाहू बॅलेस्टीक मिसाईल आहे. या मिसाईलला नौदलाच्या अरिहंत क्लासच्या पाणबुड्यांना हे मिसाईल लावले आहे.यापूर्वी भारतीय नौदल के-15 चा वापर करीत होती. परंतू के-4 slbm त्याहून चांगल्या अधिक अचूक, चांगली, मॅन्युवरेबल आणि सहजपणे ऑपरेट होणारी मिसाईल आहे.

आयएनएस एरिहंत आणि अरिघात पाणबुड्यात चार व्हर्टिकल लॉंचिंक सिस्टीम आहेत. ज्यातून हे मिसाईल लॉंच होते. या मिसाईट 17 टन वजनाचे असून त्याची लांबी 39 फूट आहे. त्याचा व्यास 4.3 मीटर आहे. यात 2500 किलोग्रॅम वजनाचे अण्वस्र वाहून शत्रूवर अचूक हल्ला करता येतो.

चार हजार किमीचा पल्ला

दोन टप्प्याच्या या मिसाईल सॉलिड रॉकेट मोटरवर चालते. यात प्रोपेलेंट देखील सॉलीड आहे. या मिसाईलची ऑपरेशनल रेंज चार हजार किमी आहे. भारत कोणावरही प्रथम अणूहल्ला करणार नाही असे भारताचे तत्व आहे. परंतू भारतावर कोणी हल्ला केला तर भारत त्यांना सोडणार नाही. त्यामुळे सेंकड अटॅकसाठी असे मिसाईल भारताकडे असणे गरजेचे होते.

यापूर्वी देखील झाल्या चाचण्या

15 जानेवारी 2010 रोजी विशाखापट्टनम किनाऱ्यावर देखील पाण्याच्या 160 फूट आत पॉन्टून तयार करुन तेथून या मिसाईलची डेव्हलपमेंट लॉंच झाले होते.त्यानंतर त्याच जागी 24 मार्च 2024 रोजी तेच तंत्र वापरुन या मिसाईलची पहिली यशस्वी चाचणी झाली होती. त्यानंतर 7 मार्च 2016 रोजी या दुसरी यशस्वी चाचणी झाली. साल 2016 मध्ये आयएनएस अरिहंत वरुन 700 km रेंजच्या मिसाईलची चाचणी झाली होती.

दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद.
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात.
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात.
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार.
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय मानवंदना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय मानवंदना.
कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी गर्दी
कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी गर्दी.
रोहित पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांशी साधला संवाद
रोहित पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांशी साधला संवाद.
दादा अन् दरारा दोघं गेले! अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळला
दादा अन् दरारा दोघं गेले! अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळला.
दादा गेले... हे राज्यातील कार्यकर्त्यांना मान्यच नाही...
दादा गेले... हे राज्यातील कार्यकर्त्यांना मान्यच नाही....