आयपीएस अधिकाऱ्याने जय हिंद ऐवजी इंशाअल्ला बोलताच काँग्रेस नेत्याची BJPवर टीका, म्हणाला…
पश्चिम बंगालमध्ये आयपीएस बुशरा बानो यांना ‘इंशाअल्लाह’ म्हटल्यामुळे झालेल्या बदलीबाबतचा वाद अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणी काँग्रेस खासदराने वक्तव्य करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये खडगपूरच्या एएसपी आणि २०२१ बॅचच्या आयपीएस अधिकारी बुशरा बानो यांच्या बदलीबाबत मोठी खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमादरम्यान जय हिंद बोलण्याऐवजी त्यांनी ‘इंशाअल्लाह’ म्हटल्यामुळे मोठी कारवाई करण्यात आली. त्यांची थेट बदली करण्यात आली आहे. या दरम्यान आता काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढ़ी यांनी मंगळवारी बुशरा बानो प्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढ़ी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, ‘एक द्वेषपूर्ण न्यूज चॅनेलने आधी तो व्हिडिओ खळबळजनक बनवून पोस्ट केला आणि महिला आयपीएसला ऑनलाइन ट्रोल केले गेले, राज्य सरकारने त्यांचा साथ देण्याऐवजी दुसऱ्या दिवशी त्यांची बदली करून टाकली.’
इमरान प्रतापगढ़ी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेत जगभरातून आलेल्या मुस्लिम राष्ट्राध्यक्षांना कडकडून मिठी मारतात. तर पश्चिम बंगाल सरकारने खडगपूरमध्ये तैनात आयपीएस बुशरा बानो यांना केवळ यासाठी बदली करून साइडलाइन केले. एका व्हिडीओ संदेशाद्वारे तरुणांशी संवाद साधताना त्यांनी इंशाअल्लाह आणि जझाकअल्लाह म्हटले होते. त्यांनी म्हटले की तर याचा अर्थ फारसा साधा आहे. इमरान प्रतापगढ़ी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये शेवटी प्रश्न विचारला की कसा भारत बनवत आहात? काय आयपीएस असोसिएशन हे पाहत आहे का?
पूर्ण प्रकरण काय आहे?
आयपीएस बुशरा बानो यांची बदली व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी झाली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी यूपीएससी उमेदवारांना प्रोत्साहन दिले होते आणि सोशल मीडियावर त्याची टीका झाली होती. व्हिडीओमध्ये बुशरा यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या निवासी कोचिंग अकादमी आणि स्पर्धा परीक्षांसह उच्च शिक्षण क्षेत्रातील तिच्या भूमिकेबद्दल सांगत होत्या. त्यांनी सांगितले होते की यूपीएससीच्या तयारीत कोचिंग अकादमीने कशी मदत केली. त्यांनी आपल्या व्हिडीओची सुरुवात अस्सलामुअलैकुमने केली तर शेवटी त्यांनी इंशाअल्लाह आणि जजाकल्लाह यांसारख्या शब्दांचा वापर केला होता. यावरूनच वाद निर्माण झाला आणि प्रश्न विचारले जाऊ लागले.
