AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात दुहेरी नागरिकत्वाची परवानगी आहे का ? काय आहेत नियम ?

भारतात राहुन विदेशी नागरिकत्व स्वीकारता येते का ? या संदर्भात भारतीय घटनेत नियम स्पष्ट करण्यात आलेले आहे. काय आहेत नेमके दुहेरी नागरिकत्वाचे नियम पाहूयात...

भारतात दुहेरी नागरिकत्वाची परवानगी आहे का ? काय आहेत नियम ?
Dual Citizenship
| Updated on: Nov 25, 2024 | 4:56 PM
Share

भारतात अनेकदा देशात राहणाऱ्या व्यक्तीकडे परदेशी नागरिकत्व देखील असल्याचे उघडकीस आले होते. अशात मग भारतात राहणाऱ्या नागरिकाला दोन नागरिकत्व ठेवण्याचा अधिकार आहे का ? त्याला भारतीय नागरिक मानले जाईल का ?या प्रश्नाचे उत्तर भारतीय घटनेत दिलेले आहे. ज्यात दुहेरी नागरिकत्वा संदर्भात काय नियम आहेत याची माहिती दिलेली आहे. भारतीय घटनेच्या कलम ८ नुसार परदेशी नागरिकाला देखील भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. परंतू त्यासाठी काही अटी आहेत. परंतू भारतीय नागरिकाजवळ जर परदेशी नागरिकत्व असेल तर त्याला भारतात राहण्याची परवानगी मिळेल का? त्याला दुहेरी नागरिकत्व बाळगता येईल का ? काय आहे कायदा पाहा…

भारतात दुहेरी नागरिकत्व ठेवता येते का याचे उत्तर इंडियन सिटीझन शिप एक्ट १९९५ मध्ये आहे. कायद्याप्रमाणे भारतात कोणत्याही भारतीय नागरिकाला दुहेरी नागरिकत्व बाळगण्याचा अधिकार नाही. जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. आणि तुम्हाला दुसऱ्या देशाचा पासपोर्ट हवा असेल तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट सरेंडर करावा लागतो. म्हणजे तुम्ही जर परदेशी नागरिकत्व मिळवले तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व सोडावे लागते.

परदेशी नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय पासपोर्ट बाळगणे भारतीय पासपोर्ट अधिनियम १९६७ अंतर्गत गुन्हा मानला जातो. सरेंडर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला नजीकच्या बीएलएस सेंटरवर जावे लागेल आणि प्रक्रीया सुरु करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सरेंडर सर्टीफीकेट मिळेल, हे पुरावा म्हणून तुमच्याजवळ असेल आणि भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्यानंतर परदेशी नागरिकाप्रमाणे येथे राहावे लागेल.

सरेंडर सर्टीफिकेटची आवश्यकता

भारतीय व्हीसा, ओसीआय कार्ड आणि अन्य दुतावासीय सेवेसाठी तुम्हाला सरेंडर सर्टीफिकेटची आवश्यकता असते. गृहमंत्रालय पोर्टलवरुन ऑनलाईन घोषणा करुनही भारतीय नागरिकता त्याग करता येते. भारत सरकार भारतीय मुळाच्या काही व्यक्तींना परदेशी नागरिकत्व ( ओसीआय ) कार्डधारक रुपात नोंदणी करते. ओसीआय अनिवार्य रुपात अन्य विशेषाधिकारांसह एक आजीवन व्हीसा आहे. तरी ओसीआय कार्ड धारकाला दुहेरी नागरिकत्वाचा दावा करण्याचा अधिकार नाही.

भारतीय नागरिकता कशी मिळते ?

भारतीय नागरिकत्व मिळण्याचे अनेक नियम आहे.

१ – भारतीय नागरिकाशी विवाह करुन – जर कोणा भारतीयाचा परदेशी तरुण किंवा तरुणीशी विवाह झाला तर त्याला भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज करता येतो

२ – ११ ते १५ वर्ष भारतात काढले – जर कोणा विदेशी नागरिकाने भारतात ११ ते १५ वर्षे काढली असतील. तर असा न व्यक्ती भारतात नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतो

३ – अल्पसंख्यांक असल्यास – भारता परदेशी रिलीजियस मायनॉरिटीना नागरिकत्व मिळण्याचा नियम आहे. सिटीझन अमेंडमेंट एक्ट ( CAA ) अंतर्गत पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि अफगाणिस्तानात किंवा शेजारील देशातील अल्पसंख्यांक अर्थात रिलीजियस मायनॉरिटी अंतर्गत येत असेल आणि त्याला तेथे धर्मावरुन छळ केलेला असेल आणि तो ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आला असेल तर तो नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतो.

४ – संविधान आधारे – जेव्हा भारतात संविधान लागू झाले तेव्हा भारतात जे लोक रहात होते. त्यांना भारतीय नागरिकत्व आपोआप मिळालेले आहे. मग भलेही त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसतील.

५ – जन्माआधारे – भारतात जन्मलेल्या मुलाला जन्म घेताच भारतीय नागरिकत्व मिळते.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.