AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण गांधी टीएमसीमध्ये जाणार?; पुढच्या आठवड्यात ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता

भाजप नेते वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यामुळेच ते सातत्याने भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे.

वरुण गांधी टीएमसीमध्ये जाणार?; पुढच्या आठवड्यात ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता
Varun Gandhi
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 4:43 PM
Share

नवी दिल्ली: भाजप नेते वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यामुळेच ते सातत्याने भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वरुण गांधी हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. वरुण गांधी हे टीएमसी नेत्यांच्या संपर्कात असून ते लवकरच टीएमसीत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

टीएमसीच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी वरुण गांधी त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या निर्णयावरही त्यांनी सवाल केले आहेत. तसेच त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रंही लिहिलं आहे.

मंत्रिमंडळातही नाही आणि कार्यकारिणीतही नाही

वरुण गांधी गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळेच ते केंद्र सरकार आणि भाजप शासित राज्यातील कारभारावर सातत्याने निशाना साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यात स्थान मिळेल अशी वरुण यांना अपेक्षा होती. मात्र, भाजपने त्यांना केंद्रात संधी दिली नाही. तसेच पक्षाच्या कार्यकारिणीत त्यांना आणि त्यांची आई मनेका गांधी यांना स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासून त्यांनी थेट पक्षावरच हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारावरून तर त्यांनी अनेक वेळा योगी सरकारवर हल्ला चढवला आहे. तसेच गांधी जयंतीच्या दिवशी गांधी विरुद्ध गोडसे हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू होता. त्यावरूनही त्यांनी हल्लाबोल केला होता.

टीएमसीच्या नेत्यांनी दिले संकेत

तृणमूल काँग्रेस संपूर्ण देशात काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहू पाहत आहे. टीएमसीने पश्चिम बंगालमधून बाहेर पडत हिंदी भाषिक राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुढच्या आठवड्यात ममता बॅनर्जी या दिल्लीत येण्याची शक्यात आहे. यावेळी वरुण गांधी या ममता बॅनर्जींना भेटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे टीएमसीला ही उत्तर प्रदेशात बड्या नेत्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात वातावरण निर्मिती करू पाहणारा नेता टीएमसीला हवा आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते ललितेश त्रिपाठी यांनी नुकताच टीएमसीत प्रवेश केला आहे. पण संपूर्ण राज्याला अपिल होईल असा नेता टीएमसीला अद्याप मिळालेला नाही. वरुण गांधी हा टीएमसीसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार टीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्याने वरुण गांधी भाजप सोडण्याच्या मनस्थितीत असून ते टीएमसीच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वरुण गांधी भाजप सोडण्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

प्रियंका गांधींसोबत चर्चा करणार?

एकीकडे वरुण गांधी टीएमसीत जाण्याची चर्चा असतानाच त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याशीही चर्चा केली आहे. लंच किंवा डिनरच्यावेळी या दोघांची चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, या भेटीनंतर काहीही राजकीय उलथापालथ झालेली नाही. काही भाजप नेत्यांच्या मते वरुण यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली असून ते केव्हाही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. टीएमसीमध्ये त्यांना अधिक संधी नाहीत. हिंदी भाषिक राज्यात टीएमसीचं अस्तित्व नाहीये. त्यामुळे ते काँग्रेसमध्येच जाऊ शकतात, असं या नेत्यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या:

7th Pay Commission: नोव्हेंबरमध्ये 4 महिने जोडून मिळणार थकबाकी, DA-DR मध्ये चांगली वाढ

‘ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, कट कारस्थानही रचलं नाही: हायकोर्ट

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.