AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर निकालाच्या निर्णयावर कसे झाले एकमत, सरन्यायाधीशांनी सांगितले काय घडले

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. . 134 जुन्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने दीर्घ इतिहास, विविध दृष्टीकोन लक्षात घेतला. सर्वांनी एकमताने एका स्वराने निर्णय घेण्याचे ठरवले.

राम मंदिर निकालाच्या निर्णयावर कसे झाले एकमत, सरन्यायाधीशांनी सांगितले काय घडले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 02, 2024 | 10:01 AM
Share

नवी दिल्ली, दि. 2 जानेवारी 2024 | अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. त्याचा निकाल सर्व न्यायमूर्तींनी एकमताने दिला. परंतु हा निकाल कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत मिळाले नाही. तसेच या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळणारही नाही. 134 जुन्या या खटल्याचा निकाल लिहिणाऱ्याचे रहस्य हे उलगडले जाणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी या खटल्याचा निकाल दिला होता. बाबरी मशीद अवैध होती, हे ही या निकालात म्हटले गेले आहे. या निकालानंतर अयोध्या राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

निकाल देणारे कोण होते न्यायमूर्ती

अयोध्या खटल्याचा निकाल देण्यासाठी पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ तयार करण्यात आले होते. त्यात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नजीर आणि सध्याचे सरन्याधीश धनंजय यशवंत चंद्रचूड होते. 134 जुन्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने दीर्घ इतिहास, विविध दृष्टीकोन लक्षात घेतला. सर्वांनी एकमताने एका स्वराने निर्णय घेण्याचे ठरवले. निकालाच्या प्रतीवर कोणाचे नाव नसणार आहे, हे ही एकमताने ठरवण्यात आले. यामुळे हा निकाल कोणी लिहिला, त्या न्यायमूर्तींचे नाव समजणारच नाही. यावेळी न्या. चंद्रचूड यांना कलम 370 संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला.

काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्या खटल्याचा निकाल दिला होता. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला होता. बाबरी मशीद अवैध होती, असे सांगत ही जागा राम मंदिर ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेतला. तसेच मशीदीसाठी पाच एकर जागा दुसरीकडे देण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पाच ऑगस्ट 2020 राम मंदिराचा भूमी पूजन कार्यक्रम झाला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक साधू-संत सहभागी झाले होते.

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...