AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर निकालाच्या निर्णयावर कसे झाले एकमत, सरन्यायाधीशांनी सांगितले काय घडले

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. . 134 जुन्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने दीर्घ इतिहास, विविध दृष्टीकोन लक्षात घेतला. सर्वांनी एकमताने एका स्वराने निर्णय घेण्याचे ठरवले.

राम मंदिर निकालाच्या निर्णयावर कसे झाले एकमत, सरन्यायाधीशांनी सांगितले काय घडले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 02, 2024 | 10:01 AM
Share

नवी दिल्ली, दि. 2 जानेवारी 2024 | अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. त्याचा निकाल सर्व न्यायमूर्तींनी एकमताने दिला. परंतु हा निकाल कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत मिळाले नाही. तसेच या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळणारही नाही. 134 जुन्या या खटल्याचा निकाल लिहिणाऱ्याचे रहस्य हे उलगडले जाणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी या खटल्याचा निकाल दिला होता. बाबरी मशीद अवैध होती, हे ही या निकालात म्हटले गेले आहे. या निकालानंतर अयोध्या राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

निकाल देणारे कोण होते न्यायमूर्ती

अयोध्या खटल्याचा निकाल देण्यासाठी पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ तयार करण्यात आले होते. त्यात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नजीर आणि सध्याचे सरन्याधीश धनंजय यशवंत चंद्रचूड होते. 134 जुन्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने दीर्घ इतिहास, विविध दृष्टीकोन लक्षात घेतला. सर्वांनी एकमताने एका स्वराने निर्णय घेण्याचे ठरवले. निकालाच्या प्रतीवर कोणाचे नाव नसणार आहे, हे ही एकमताने ठरवण्यात आले. यामुळे हा निकाल कोणी लिहिला, त्या न्यायमूर्तींचे नाव समजणारच नाही. यावेळी न्या. चंद्रचूड यांना कलम 370 संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला.

काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्या खटल्याचा निकाल दिला होता. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला होता. बाबरी मशीद अवैध होती, असे सांगत ही जागा राम मंदिर ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेतला. तसेच मशीदीसाठी पाच एकर जागा दुसरीकडे देण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पाच ऑगस्ट 2020 राम मंदिराचा भूमी पूजन कार्यक्रम झाला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक साधू-संत सहभागी झाले होते.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा