AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात 10 रुपयांना मिळणारी ही एक वस्तू फक्त खिशात ठेवा, आयुष्यात साप कधी जवळ येणार नाही, घरापासूनही राहील दूर

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन तापल्यामुळे साप बिळातून बाहेर पडण्याच्या घटना घडतात. अनेकदा थंड जागेच्या शोधात हे साप आपल्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे सावध असलं पाहिजे.

बाजारात 10 रुपयांना मिळणारी ही एक वस्तू फक्त खिशात ठेवा, आयुष्यात साप कधी जवळ येणार नाही, घरापासूनही राहील दूर
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 21, 2026 | 9:08 PM
Share

अनेकांना सापाची भीती वाटते, साप पहाताच अंगावर काटा येतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजही सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमजुती आहेत. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साप कधीच स्वत:हून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करत नाही.  साप फक्त दोनच परिस्थितीमध्ये तुम्हाला दंश करू शकतात. एक म्हणजे जर सापाला वाटलं की तुम्ही त्याची शिकार आहात तर आणि दुसरं म्हणजे सापाला तुमच्यापासून काही धोका जाणवला तर आणि तरच तुम्हाला सर्पदंश होण्याची शक्यता असते.  त्यामुळे जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका. किंवा त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला सापांबद्दल फारशी माहिती नसते, तुम्ही जो साप पकडणार आहात तो विषारी की बिनविषारी हे देखील तुम्हाला माहिती नसतं, त्यामुळे सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.

दरम्यान असे देखील काही साप असतात जे थंडीच्या दिवसांमध्ये उबेसाठी तुमच्या पांघरुणात प्रवेश करतात आणि तुमची थोडी जरी हालचाल झाली की ते तुम्हाला दंश करतात. जर उदाहारण द्यायचं झालं तर मण्यार जातीच्या सापाचं देता येईल. मण्यार साप हा अत्यंत विषारी प्रजातीचा साप आहे. या सापाचा वावर भारतामधील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आढळतो. या सापाचं वैशिष्ट म्हणजे हा साप निशाचर आहे, तो रात्रीच्यावेळीच शिकारीसाठी बाहेर पडतो. त्यामुळे माणूस झोपेत असताना या सापाने दंश करण्याचं प्रमाण हे इतर सापांपेक्षा खूप जास्त आहे. बर हा साप चावला तर लवकर कळत देखील नाही, मात्र त्यानंतर अचानक विषाचा प्रभाव जाणवायला लागतो. वेळेत उपचार न मिळाल्यानं रुग्ण दगावू देखील शकतो. इतर सापांपेक्षा या सापामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे अधिक आहे.

दरम्यान त्यामुळे सापांपासून नेहमी सतर्क असलं पाहिजे. अशी काही वस्तू, झाडं असतात. ज्यामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करत नाहीत. या झाडांचे गुणधर्म असे असतात ज्यामुळे सापांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी साप येत नाहीत. अशीच एक वनस्पती आहे ती म्हणजे सर्पगंधा ही वनस्पती जर तुमच्या घरात असेल तर साप घरात प्रवेश करत नाही. तसेच या झाडाच्या काही वाळलेल्या काड्या जरी तुमच्या खिशात असतील तरी देखील तुम्ही सापांपासून सुरक्षित राहू शकतात, असं म्हटलं जातं.  दरम्यान जर सर्पदंश झालाच तर कुठेही वेळ वाया न घालवता थेट वैद्यकीय उपचार घ्यावेत, ज्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकतात.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?