AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यायाधीश बीव्ही नागराथन होणार भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश?; कॉलेजियमकडून 9 न्यायाधीशांची शिफारस

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमने 9 न्यायाधीशांची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. कॉलेजियमने यात तीन महिला न्यायाधीशांच्या नावाचीही शिफारस केली आहे. (Justice BV Nagarathna In Line To Be First Woman Chief Justice Of India)

न्यायाधीश बीव्ही नागराथन होणार भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश?; कॉलेजियमकडून 9 न्यायाधीशांची शिफारस
Supreme Court
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 10:23 AM
Share

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमने 9 न्यायाधीशांची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. कॉलेजियमने यात तीन महिला न्यायाधीशांच्या नावाचीही शिफारस केली आहे. जर कॉलेजियमच्या नावांना मंजुरी मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिला बसू शकते. कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बीव्ही नागराथन, तेलंगणना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या नावाची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे नऊ न्यायाधीशांच्या यादीत पहिल्या तिन्ही महिला न्यायाधीशांची नावे आहेत. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Justice BV Nagarathna In Line To Be First Woman Chief Justice Of India)

जस्टीस बीव्ही नागराथन या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होऊ शकतात. 2027मध्ये ही नियुक्ती होणार आहे. कॉलेजियमचे ज्येष्ठ वकील पीएस नरसिम्हा यांच्या नावाचीही यावेळी शिफारस करण्यात आली आहे. कॉलेजियमने न्यायाधीश एएस ओका, जस्टिस विक्रम नाथ, जस्टिस जेके माहेश्वरी, जस्टीस सीटी रवींद्र कुमार आणि जस्टिस एमएम सुंदरेश यांच्या नावाचीही शिफारस केली आहे.

दीड वर्षांपासून नियुक्ती नाहीच

यापूर्वी केंद्र सरकारने लोकसभेत माहिती देताना सर्वोच्च न्यायालयातील 8 न्यायाधीशांची पदे रिक्त असल्याचं सांगितलं होतं. येत्या एक दोन महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एफ. नरीमन आणि जस्टिस नवीन सिन्हा निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील एकूण स्वीकृत 34 न्यायाधीशांमध्ये 29 टक्के पदे रिक्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात गेल्या दीड वर्षांपासून न्यायाधीशांची नियुक्तीच झालेली नाही. सरकारी आकड्यानुसार 2018मध्ये 8 आणि 2019मध्ये 10 न्यायाधीशांची नियुक्ती झाली. सर्वोच्च न्यायालयात सध्या 26 न्यायाधीश कार्यरत आहेत. त्यात 25 पुरुष आणि केवळ एका महिला न्यायाधीशाचा समावेश आहे.

केंद्र सरकार दोषी

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीला होणाऱ्या विलंबाला थेट केंद्र सरकारला दोषी ठरवलं आहे. हायकोर्टाच्या कॉलेजियमने न्यायाधीशांची शिफारस केली होती. तरीही सरकारने या न्यायाधीशांची नियुक्ती केली नसल्याचं कोर्टाने एप्रिलमध्ये म्हटलं होतं.

मोदींसमोर मुद्दा उपस्थित

काही वर्षांपूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर उपस्थित केला होता. न्यायाधीशांच्या नियुक्तीला उशीर होत आहे. त्यामुळे कोर्टात अनेक केसेक पेंडिग आहेत, असं ठाकूर यांनी मोदींना सांगितलं होतं. 2016मध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून न्यायालय आणि सरकारच्या दरम्यान वादही झाला होता. (Justice BV Nagarathna In Line To Be First Woman Chief Justice Of India)

संबंधित बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 10 हजारांनी वाढ, सक्रिय रुग्णसंख्या मात्र घटली

काश्मीरमध्ये भाजप नेत्याची अतिरेक्यांकडून हत्या; सर्च ऑपरेशन सुरू

एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल, भारत माता की जयच्या घोषणेनं मायभूमीत स्वागत

(Justice BV Nagarathna In Line To Be First Woman Chief Justice Of India)

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी