AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण; अखंड भारताचा संकल्प, कांचीपीठाच्या शंकराचार्यांनी काय करुन दिली आठवण?

Kanchi Peeth Shankaracharya on RSS centenary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या विजयादशमीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. कांची पीठाचे शंकराचार्य आणि ज्येष्ठ नेते करण सिंग यांनी संघाला शुभेच्छा देताना राष्ट्राच्या जडणघडणीत या संघटनेची भूमिका विषद केली आहे.

RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण; अखंड भारताचा संकल्प, कांचीपीठाच्या शंकराचार्यांनी काय करुन दिली आठवण?
अखंड भारताची आठवण
| Updated on: Oct 01, 2025 | 8:58 AM
Share

Kanchi Peeth Shankaracharya on RSS centenary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या विजयादशमीच्या पावन पर्वावर 100 वर्षे पूर्ण होतील. कॅडर बेस असलेल्या अशा अनेक संघटना तयार झाल्या. कसोटीवर चालल्या. पण त्यांना संघासारखं सातत्य टिकवात आले नाही. संघ ध्वज हा गुरूस्थानी आहे. तर व्यक्ती या सेवक आहेत. “सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले” ही संघाची शिकवण आहे. गाजावाजा नाही, प्रसिद्धी नाही. तरीही अखंड कार्यरत राहणाऱ्या या संघटनेविषयी जगात कुतुहल आहे. संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. कांची पीठाचे शंकराचार्य आणि ज्येष्ठ नेते करण सिंग यांनी संघाला शुभेच्छा देताना राष्ट्राच्या जडणघडणीत या संघटनेची भूमिका विषद केली आहे.

अखंड भारताची आठवण

कांची पीठाचे शंकराचार्यांनी यावेळी अखंड भारताची आठवण जागवली. अनेकांनी अखंड भारताची ज्योत मनात तेवत ठेवली आहे. 1925 मध्ये त्याआधारेच डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये संघाचा पाया रचला. देशाच्या मध्यवर्ती भागात विदर्भात या राष्ट्रीय ध्येयवादी संघटनेची सुरुवात झाली. “भारताची संस्कृती, सभ्यता, शांती, विकास हे निःस्वार्थ सेवेत रूजलेले आहे. नागपूरमध्ये हा यज्ञकुंड सुरू झाला. त्याला आता 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2025 मध्ये संघ शताब्दी वर्ष साजरे करत आहे.,” असे ते म्हणाले.

संघाचे सेवा प्रकल्प आणि चारित्र्य निर्मितीचे कार्य भारतीय न्यायशास्त्र आणि धर्माशी सुसंगत आहे. कांची पीठाशी संघाच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देताना, त्यांनी आदरणीय शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती महाराज यांनी संघाला आशीर्वाद दिल्याची आठवण करुन दिली. चेन्नईमध्ये झालेल्या मेळाव्याचा उल्लेख करत, त्यावेळी गोळवलवकर गुरूजी यांनी त्यांच्या गुरुबद्दल आदरभाव बाळगून कांचीपूरमला खास भेट दिली. त्यावेळी त्यांच्या मागे अखंड भारताचा नकाशा होता याची आठवण पुन्हा एकदा शंकराचार्यांनी यावेळी संघाला करून दिली. गोळवलकर गुरुजींना देव आणि राष्ट्राची भक्ती करण्याचा आशीर्वाद कांचीपूरम येथून मिळाला होता असे आताच्या शंकराचार्यांनी स्मरण केले.

विराट हिंदू समाज स्थापनेच्या आठवणीला उजाळा

तर ज्येष्ठ नेते करण सिंग यांनी विराट हिंदू समाज संघटना स्थापनेवेळी संघाने केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला. विराट हिंदू समाज 1982 मध्ये स्थापन झाला होता. त्यावळी संघाने भरभरून मदत केल्याचे ते म्हणाले. आता संघ शताब्दी वर्षात आला आहे. संघाच्या लाखो स्वयंसेवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारत हा विकसीत आणि शक्तीशाली व्हावा. जगाचे नेतृत्व भारताने करावे अशा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उज्ज्वल भारतासाठी संघाची भूमिका त्यांनी विषद केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...