AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर सियापेक्षाही डेंजर निघाली, साखरपुड्यानंतर थेट बॉयफ्रेंडला..; अंगावर काटा आणणारी घटना!

सध्या सगळ्या देशात केतन अग्रवाल प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. लग्न करायचं नव्हतं, म्हणून सिया गोयलने थेट लोहगडावरुन होणाऱ्या नवऱ्याला खोल दरीत ढकलून दिलं. आता असचं पण बिलकुल या उलट प्रकरण समोर आलं आहे.

ही तर सियापेक्षाही डेंजर निघाली, साखरपुड्यानंतर थेट बॉयफ्रेंडला..; अंगावर काटा आणणारी घटना!
ketan agrawal siya goyal reverse case (1)
| Updated on: Jun 26, 2026 | 9:27 AM
Share

सध्या देशभरात केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा आहे. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने लोहगडावरुन खोलं दरीत ढकलून दिलं. या घटनेत केतनचा मृत्यू झाला. सियाचं केतन बरोबर लग्न ठरलं होतं. हॉलपासून इतर गोष्टींची लग्नाची कामं सुरु होती. मात्र, त्याआधी सियाने प्रियकराच्या मदतीने केतनला संपवलं. आता राजस्थानच्या टोक जिल्ह्यात बिलकुल या उलट एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल सारखीच ही केस आहे. फक्त त्यात थोडा फरक आहे. इथे प्रेयसीला साखरपुडा झाल्यानंतर प्रियकरापासून सुटका करुन घ्यायची होती. त म्हणून तिने प्रियकराला मार्गातून हटवण्यासाठी गुंडांना सुपारी दिली. गुंडांची दहशत आणि मानसिक तणावामुळे अखेर जयपूरमधल्या या मुलाने आपल्या मामाच्या घरात आयुष्याचा शेवट केला. राजस्थानच्या जगदीश नगरमधील ही घटना आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून त्याचं नाव मनोज नामा आहे.

मनोजचा भाऊ पंकज नामाने पोलीस आणि मीडियाशी बोलताना सांगितलं की, “मनोजचे दीर्घकाळापासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. अलीकडेच त्या युवतीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. घटनेच्या एक दिवस आधी सुद्धा दोघांमध्ये फोनवरुन जोरदार भांडणं झालं. मुलीकडून फसवणूक झाल्यामुळे मनोज मानसिक तणावाखाली होता”

त्यांना मनोजच्या मागे सोडलं होतं

मनोजपासून पाठलाग सोडवण्यासाठी मुलगी कुठल्याही पातळी पर्यंत जायला तयार होती असा नातेवाईकांनी गंभीर आरोप केला. मनोजला शारीरिक हानी पोहोचवण्यासाठी त्याला धमकावण्यासाठी तिने काही स्थानिक गुंडांना सुपारी दिली होती, असा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यांना मनोजच्या मागे सोडलं होतं. गुंडांची हीच भिती आणि मानसिक दबावामुळे मनोज जयपूर सोडून टोकला निघून गेला.

म्हणून मामाच्या घरी आला

मनोज इथे लपण्यासाठी म्हणून मामाच्या घरी आला होता. या सुपारीबद्दल आणि त्याच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल मनोजच्या कुटुंबाला त्याच्या एका मित्राकडून समजलं होतं. नातेवाईकांनी प्रेयसी आणि गुंडांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?