AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा मोठं संकट, आता वादळाचा धोका, हवामान खात्याचा इशारा काय?

भारतातील अनेक राज्यांना पावसाचा फटका बसत असताना, हवामान खात्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ला नीनाची शक्यता वर्तवली आहे. जरी ला नीना तटस्थ असल्याचे सांगितले जात असले तरी, त्याचा पावसावर किती परिणाम होईल हे महत्त्वाचे आहे. मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याने, ला नीनाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. एल निनो आणि ला नीना यांचे स्पष्टीकरणही या लेखात दिले आहे.

पुन्हा मोठं संकट, आता वादळाचा धोका, हवामान खात्याचा इशारा काय?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 11, 2025 | 9:36 AM
Share

भारतातील अनेक राज्यांना सध्या पावसाचा फटका बसला असून पंजाब, हिमाचलमध्ये तर पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. देशात ही परिस्थिती असतानाचा आता हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीमुळे अनेकांच्या चिंतेत भर पडू शकते.सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ‘ला-निना’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. सप्टेंबरपासून ला निना पुन्हा एकदा हवामान आणि हवामानाच्या स्वरूपावर परिणाम करू शकते. त्याच्या प्रभावामुळे काही काळासाठी हवामान तात्पुरते थंड होऊ शकते, परंतु जगाच्या बहुतेक भागात जागतिक तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सप्टेंबर- ऑक्टोबर या कालावधीत ला- निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, ही प्रणाली तटस्थ असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या दोन तीन आठवड्यांत सुरु होईल त्यामुळे ‘ला निना’चा पावसावरही फारसा परिणाम होणार नाही. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ प्रणाली सक्रिय झाली, असे म्हटले जाते.

महाराष्ट्रावर परिणाम काय ?

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यात ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन आठवड्यांनी मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ला निना स्थिती निर्माण झाली तरी त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. मोसमी पावसाच्या कालावधीत ला निना स्थिती निर्माण झाली तर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असते. तसेच ही स्थिती जर हिवाळ्यात निर्माण झाली तर थंडीत वाढ होते. मात्र, ही स्थिती सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान निर्माण होणार असल्याने तिचा परिणाम जास्त होणार नाही. एल निनोच्या घटना सामान्यतः एका वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नाहीत, तर ला निनाच्या घटना एक ते तीन वर्षांपर्यंत टिकू शकतात.

एल निनो आणि ला निनो म्हणजे नक्की काय ?

एल निनो ही स्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशांत महासागराच्या मध्य आणि आग्नेय भागातील तापमान वाढते. अल निनो त्याच्या तटस्थ अवस्थेत असताना वारे विषुववृत्ताच्या बाजूने पश्चिमेकडे वाहतात आणि दक्षिण अमेरिकेतील उबदार पाणी आशिया खंडाच्या बाजूला घेऊन जातात. मात्र, एल निनो स्थितीवेळी वारे कमकुवत होतात आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. अशा स्थितीत वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना उबदार पाण्याचे प्रवाह मध्ये आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात जाऊन पश्चिम अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचतात.

हवामानाची स्थिती विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सर्वसाधारणपणे दोन ते सात वर्षांनी विकसित होतो. तर ला निनाची स्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ सक्रिय झाला, असे म्हटले जाते. ‘ला निना’मुळे प्रशांत महासागरात हवेची घनता वाढते, हवा दाट होते.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला