AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात मोठा राजकीय भूकंप होणार?; लालूप्रसाद यादव यांच्या पक्षातील नेत्याचा दावा काय?

एनडीएचे आघाडी सरकार केंद्रात स्थापन झाले आहे. या सरकारला चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोन बाबूंची गरज आहे. या दोघांपैकी एकाने जरी सरकारचा पाठींबा काढला तरी सरकार अल्पमतात येऊन कोसळू शकते असे म्हटले जात आहे.

देशात मोठा राजकीय भूकंप होणार?; लालूप्रसाद यादव यांच्या पक्षातील नेत्याचा दावा काय?
nitish kumar Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 27, 2024 | 5:52 PM
Share

देशाची 18 वी लोकसभा अस्तित्वात आली आहे. परंतू हे सरकार फार काळ चालणार नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाएटेडचे ( JDU ) प्रमुख नितीश कुमार यांनी लालूंचा साथ सोडून भाजपाची संगत केली आहे. ते आता एनडीएच्या आघाडीचा एक भाग बनले आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीची आणि विशेष करुन आरजेडीची त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा आहे. लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई विरेंद्र यांनी नितीशकुमार लवकरच भाजपाची साथ सोडणार आहेत असा दावा करुन खळबळ उडवून दिली आहे. यानंतर भाजपा बिहारमधून हद्दपार होईल असा दावा त्यांनी केला आहे.

भाई वीरेंद्र यांचा हा दावा एकीकडे असताना दुसरीकडे भाजपा नेते अश्विनी चौबे यांनी भाजपाला बिहारात स्वबळावर लढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. बिहारचे भाजपा नेते अश्विनी चौबे यांना एनडीएच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की यावेळी बिहारमध्ये एनडीएला भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायला हवी आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन केले पाहीजे. अश्विनी चौबे पुढे म्हणाले की संपूर्ण बहुमतात भाजपा एकट्याच्या बळावर पुढे आली पाहीजे, तसेच एनडीएला देखील भाजपाने पुढे आणायला हवे. पक्षात आयात केलेला माल आम्ही सहन करु शकत नाही. आपण निवडणूकीच्या राजकारणापासून दूर राहत आहोत असेही त्यांनी सांगतले.

कोणत्याही लाभाशिवाय काम करु

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे. माझी इच्छा आहे की भाजपाच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सरकार स्थापन केले पाहीजे. भाजपाने स्वत:च्या बळावर एकटे निवडून यावे आणि एनडीएला देखील पुढे आणावे. त्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागावे. मी कोणत्याही पदाच्या लाभाशिवाय हे काम योग्य पद्धतीने करु शकतो असे देखील मंत्री अश्विनी चौबे यांनी म्हटले आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.