AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha Election 2024 : India आघाडी बाबत सर्वात मोठी बातमी, VIDEO

India : ठरलं, इंडिया आघाडीत निर्णय कोण घेणार?. इंडिया आघाडीत 25 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आले आहेत. सर्व विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण हा इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश आहे.

Loksabha Election 2024 : India आघाडी बाबत सर्वात मोठी बातमी, VIDEO
जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर नेतेही या फोटोत आहेत.
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Sep 06, 2023 | 11:22 AM
Share

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी आकाराला आली आहे. सर्व विरोधी पक्षांनी मिळून ही आघाडी स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणं हा इंडिया आघाडी बनवण्यामागचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत इंडिया आघाडीच्या पाटना, बंगळुरु आणि मुंबई येथे मोठ्या बैठका पार पडल्या आहेत. प्रत्येक बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली, त्यावेळी संयोजक कोण होणार? लोगो जाहीर केला जाईल, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. मुंबईत 13 नेत्यांची समन्यव समिती स्थापन करण्यात आली. आता इंडिया आघाडीने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सध्याच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे.

आता इंडिया आघाडीच्या पटना, बंगळुरू आणि मुंबईप्रमाणे बैठका होणार नाहीत. या तिन्ही शहरात इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठका पार पडल्या. वेगवेगळ्या राज्यांचे मुख्मयंत्री, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. इंडिया आघाडीच एक विराट रुप या बैठकांमध्ये दिसलं होतं. आता मात्र यापुढे इंडिया आधाडीच्या अशा बैठका होणार नसल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक मध्य प्रदेश भोपाळ आणि पाचवी बैठक पश्चिम बंगाल कोलकातामध्ये पार पडणार होती. पण आता या बैठका रद्द झाल्या आहेत. यापुढे इंडिया आघाडीत समन्वय समितीची महत्त्वाची भूमिका असेल. इंडिया आघाडीने स्थापन केलेली 13 जणांची समन्वय समिती निर्णय घेईल.

शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार महत्त्वाची बैठक

इंडिया आघाडीत आता महत्त्वाचा मुद्दा जागा वाटपाचा आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? काँग्रेस आघाडीतील महत्त्वाचा आणि मोठा पक्ष आहे. त्यांच्या वाट्याला जागा किती येणार? आघाडीचा संयोजक कोण असेल? यासंबंधी निर्णय अजून झालेला नाही. आता 13 सप्टेंबरला शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या बैठकीत पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि 18 तारखेपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची रणनिती ठरेल. .

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल