AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस पावसाचेच, मुंबई, ठाणे अन् पालघरमध्ये मात्र ‘रेड अलर्ट’, उर्वरित राज्यात काय स्थिती राहणार?

कोकणात दाखल झालेल्या मान्सूनला राज्य व्यापण्यासाठी महिन्याचा कालावधी गेला असला तरी पावसाचा जोर मात्र, कोकण आणि मुंबईवरच राहिलेला आहे. जून महिन्यात सरासरी एवढा पाऊस केवळ कोकणात झाला होता. आता कुठे वरुणराजाने राज्यात हजेरी लावली आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Monsoon : महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस पावसाचेच, मुंबई, ठाणे अन् पालघरमध्ये मात्र 'रेड अलर्ट', उर्वरित राज्यात काय स्थिती राहणार?
8 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असून हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे.
| Updated on: Jul 07, 2022 | 10:07 PM
Share

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून (Maharashtra) राज्यात पाऊस सक्रीय झाला असला तरी जोर मात्र, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणावरच कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात जवळपास चारही विभागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. 8 जुलै (शुक्रवारी) रोजी तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच या शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडावे असेही आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आणि ठाणे पर्यंत मर्यादित असेलेला (Monsoon) पाऊस आता पालघरला घेरले आहे. या तीन शहरांसाठी हवामान विभागाने (Red Alert) रेड अलर्ट जारी केला असला तरी उर्वरित राज्यातही मुसळधार पण तुरळक ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात पाऊस तर सक्रीय झालाच पण त्याचा जोरही वाढत आहे हे विशेष.

कोकण, मुंबईत सर्वाधिक पाऊस

कोकणात दाखल झालेल्या मान्सूनला राज्य व्यापण्यासाठी महिन्याचा कालावधी गेला असला तरी पावसाचा जोर मात्र, कोकण आणि मुंबईवरच राहिलेला आहे. जून महिन्यात सरासरी एवढा पाऊस केवळ कोकणात झाला होता. आता कुठे वरुणराजाने राज्यात हजेरी लावली आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून अतिवृष्टीची इशारा

जुलै महिन्यात मान्सून आपले रुप बदलेन असा विश्वास हवामान विभागने व्यक्त केला होता. आता तो खरा होताना पाहवयास मिळाला आहे. राज्यात तर पाऊस सक्रीय झाला आहेच पण पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस हे राज्यात पावसाचेच राहणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरसह मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

खरीप पेरणीला पोषक वातावरण

आतापर्यंत मर्यादित क्षेत्रावर बरसत असलेल्या वरुणराजाने आता महाराष्ट्र व्यापाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून असलेले सातत्य सात दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे खरीप पेरणीसााठी आवश्यक असलेला पाऊस जवळपास सर्वच विभागात झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामे मार्गी लागत आहेत. उशिरा का होईना दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समधान व्यक्त होत आहे.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.