AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाकाहारी व्यक्तीला दिली मांसाहारी बिर्याणी, संतापलेल्या ग्राहकाने थेट हॉटेल मालकाला संपवलं…

Crime News: शुल्लक कारणावरून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना झारखंडची राजधानी रांचीमधील कांके पिथोरिया रोडवरील शेफ चौपाटी या हॉटेलमध्ये घडली आहे. शाकाहारी बिर्याणीऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्यामुळे झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

शाकाहारी व्यक्तीला दिली मांसाहारी बिर्याणी, संतापलेल्या ग्राहकाने थेट हॉटेल मालकाला संपवलं...
ranchi crime
| Updated on: Oct 20, 2025 | 7:10 PM
Share

देशातील नागरिकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. दररोज चोरी, दरोडा, खून, मारामारी, गोळीबार अशा घटना समोर येत असतात. अशातच आता शुल्लक कारणावरून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना झारखंडची राजधानी रांचीमधील कांके पिथोरिया रोडवरील शेफ चौपाटी या हॉटेलमध्ये घडली आहे. शाकाहारी बिर्याणीऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्यामुळे झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चुकीची बिर्याणी दिल्यामुळे हत्या…

समोर आलेल्या माहितीनुसार, रांचीतील कांके पिथोरिया रोडवरील शेफ चौपाटी या रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने शाकाहारी बिर्याणी मागवली होती, मात्र त्याला मांसाहारी बिर्याणी देण्यात आली. यामुळे वाद निर्माण झाला. या वादात शेफ चौपाटी हॉटेलचे मालक विजय कुमार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेला आहे. पोलीसांनी आता या घटनेचा तपास सुरु केला आहे. आता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती समोर आली आहे.

परिसरात दहशतीचे वातावरण

चुकीची बिर्याणी दिल्यामुळे ही हत्या झाली आहे. ही बातमी कळताच परिसरात घबराट पसरली आहे. गोळीबार झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी हॉटेल मालक विजयला यांनी रांची येथील रिम्स रुग्णालयात नेले होते, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या हत्येमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, तसेच पोलीसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रांचीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रवीण पुष्कर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. या हत्येमागे फक्त बिर्याणीचे कारण होते की दुसरे काही कारण होते याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी रांचीमधील काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही बारकाईने तपासणी करत आहेत.

स्थानिकांकडून रास्ता रोको

या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आक्रमक झाले होता. संतप्त लोकांनी कांके रोड रोखला होता. पोलीसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी रस्ता मोकळा केला. आरोपींना लवकरच अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....