AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Big News : ‘ते लोक कपडे काढायला सांगत होते आणि पोलीस…’; मणिपूरमधील व्हायरल व्हिडीओ प्रकरणात मोठा ट्विस्ट!

मणिपूरमधील भीषण वास्तव लोकांच्या समोर आलं खरं पण ही घटना आताची नसून मे महिन्यात घडली होती. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधमांनी दोन नाहीतर तीन महिलांना विवस्त्र केल्याची माहिती समोर आली आहे.

Manipur Big News : 'ते लोक कपडे काढायला सांगत होते आणि पोलीस...'; मणिपूरमधील व्हायरल व्हिडीओ प्रकरणात मोठा ट्विस्ट!
| Updated on: Jul 21, 2023 | 9:02 PM
Share

मुंबई : मणिपूरमधील दोन महिलांचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मणिपूरमधील भीषण वास्तव लोकांच्या समोर आलं खरं पण ही घटना आताची नसून मे महिन्यात घडली होती. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधमांनी दोन नाहीतर तीन महिलांना विवस्त्र केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यामधील एक पीडितेने  4 मेला नेमकं काय घडलं होतं? याबाबत मोठा खुलासा केला आहे.

4 मे ला नेमकं काय घडलं होतं?

मैतेई समाजाच्या लोकांनी फाइनोम गावावर तसा 3 मेलाच हल्ला केला होता. कारण त्या गावामध्ये कुकी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.  3 मे रात्री 3 वाजता फाइनोम गावात घुसून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुकी समाजाच्या लोकांनी त्यांना हुसकावून माघारी परतवून लावलं होतं.

4 मेला रात्री मैतेई समाजातील जळपास 800 ते 1000 तरूण परत एकदा फाइनोम गावात घुसले. त्यांच्यातील प्रत्येकाच्या हातामध्ये लाकूड आणि हत्यारं होतीत. मैतेई समाजाने गावकऱ्यांवर हल्ला सुरू केला. त्यांची घरं जाळलीत सर्व लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. यामधील 5 जणांनी जंगलाच्या दिशेने पळायला सुरूवात केली, यात 3 महिला आणि 2 पुरूषांचा समावेश होता.

पाच कुकी समाजाच्या लोकांना नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना गाडीमध्ये घेतलं. मात्र पुढे गेल्यावर त्यांना मैतेई समाजाच्या लोकांनी अडवलं आणि गाडीमधून पाचही जणांना बाहेर काढलं. पोलीस त्यांना वाचवतील असं वाटलं पण तसं काही झालं नाही. त्यातील 53 वर्षीय पीडितने सांगितल की, रात्रीपासूनच आम्ही घाबरलो होतो आणि परत सकाळी झालेल्या या हल्ल्यामुळे आम्ही जंगलाच्या दिशेने पळत गेलो होतो.

23 वर्षीय पीडितने सांगितलं की, आम्ही पोलिसांच्या गाडीमध्ये होतो त्यामुळे सुरक्षित होतो असं वाटलं होतं. मात्र पोलिसांनी मैतेई समाजाच्या लोकांमध्ये आम्हाला सोडलं, आम्हाला बाहेर सोडल्यावर घोळक्यामध्ये असलेल्या लोकांनी आम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर अंगावरील कपडे काढ अशी धमकी दिली. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही अखेर आम्ही कपडे काढल्याचं तिने सांगितलं.

जे दोन पुरूष होते त्यातील एक 56 वर्षाच्या व्यक्तिला मारलं आणि त्यानंतर दुसरा 19 वर्षीय तरूण मुलगा ज्याने प्रतिकार केला तर त्यालाही संपवण्यात आलं. दोघांना मारल्यावर जमावाने तिघींना कपडे काढायला भाग पाडलं आणि त्यांचा व्हिडीओ शुट करण्यात आला. मात्र यामधील फक्त दोघी व्हिडीओमध्ये दिसल्या होत्या. पण प्रत्यक्षात तिघींना विवस्त्र करण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं.

दरम्यान, 19 जुलैला त्या दोन महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आम्ही आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती दिली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.