AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडिशाहून दिल्ली एम्समध्ये विमानाने नेलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असतानाच….

पुरी जिल्ह्यात तीन हल्लेखोरांनी मैत्रिणीच्या घरी निघालेल्या मुलीवर हल्ला केला त्यानंतर तिच्यावर अत्याचा करत थेट 15 वर्षीय मुलीला जाळून टाकले. या धक्कादायक घटनेने राज्यात संतापाची लाट बघायला मिळाली. उपचार सुरू असतानाच आता मुलीचा जीव गेलाय.

ओडिशाहून दिल्ली एम्समध्ये विमानाने नेलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असतानाच....
odisha puri
| Updated on: Aug 03, 2025 | 10:17 AM
Share

ओडिशामध्ये एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये. पुरी जिल्ह्यात तीन हल्लेखोरांनी मैत्रिणीच्या घरी निघालेल्या मुलीवर हल्ला केला त्यानंतर तिच्यावर अत्याचा करत थेट 15 वर्षीय मुलीला जाळून टाकले. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडालीये. 19 जुलैला सकाळी पुरी जिल्ह्यातील भार्गवी नदीच्या काठावर तीन अज्ञात पुरूषांनी मुलीचे अपहरण करून तिला जाळून टाकल्याचा आरोप आहे.

15 वर्षीय मुलीने सोडले प्राण एम्स रूग्णालयात घेतला शेवटचा श्वास 

या घटनेनंतर बालंगा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तिच्या आईने म्हटले आहे, अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिच तीन लोकांनी अपहरण केले आणि तिच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून तिला जाळून दिले. धक्कादायक म्हणजे यादरम्यान ती मुलगी तब्बल 70 टक्के भाजली होती. या घटनेनंतर तिला लगेचच आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केले दु:ख 

पुढील उपचारासाठी तिला एम्स भुवनेश्वर येथे नेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विमानाने एम्स दिल्ली येथे नेण्यात आले, जिथे तिच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉक्टरांकडून तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आली. मात्र, शेवटी तिचा जीव गेलाय. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मुलीच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. 

15 वर्षीय मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना घडली घटना 

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, बलंगा परिसरातील पीडितेच्या मृत्यूबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे. सरकारच्या वतीने सर्व प्रयत्न करण्यात आली. दिल्लीतील एम्सच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या अहोरात्र प्रयत्नांना न जुमानता, तिचे प्राण वाचवता आले नाहीत, मी पीडितेच्या आत्म्याला शांती मिळो आणि तिच्या कुटुंबाला हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची शक्ती देवाने द्यावी, अशी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.