ज्यांना झुरळ म्हणून हिणवले त्यांनीच मोदी सरकारला झुकवले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा..
Dharmendra Pradhan Resign : दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू होते. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे.

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू होते. अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या नाही तर तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ येईल, असे त्यांनी थेट पंतप्रधानांना म्हटले. आता धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. हा मोठा धक्का मोदी सरकारला आहे. कॉकरोच जनता पार्टीने देशभर नीट परीक्षेच्या विरोधात आंदोलन सुरू केले. काही वेळापूर्वीच जंतर मंतरवर मोठी दगडफेक झाली. विद्यार्थी आक्रमक भूमिक घेताना दिसले. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. काल कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी सरकारने 3 पैकी त्यांच्या 2 मागण्या अगोदरच मान्य केल्या होत्या. आज पुन्हा एकदा त्यांची सरकारसोबत बैठक होती.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितला होता. आज बैठक होण्यापूर्वीच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात होता. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबईमध्येही मोठे आंदोलन होते. दिल्लीतील आंदोलन चिघळताना दिसले. अभिजीत दिपकेने मोठा इशारा सरकारला दिला होता.
20 जूनपेक्षा अधिक मोठा मोर्चा काढला जाईल. यासोबतच त्यांनी दिल्ली पोलिसांवरही गंभीर आरोप केले होते. ज्यांना झुरळ म्हणण्यात आले. त्याच झुरळांसमोर झुकण्याची वेळ सरकार पुढे आली. अखेर मोदी सरकारला झुकावे लागले. हा मोठा विजय कॉकरोच जनता पार्टीचा म्हणावा लागेल. जवळपास महिन्यापासून तिथे आंदोलन सुरू होते.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकार घेणार की नाही? यावरून विविध चर्चा या रंगताना दिसल्या. मात्र, सरकारने अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. सरकारवरील दबाब वाढला. 12 वर्षात पहिल्यांदाच सरकारला एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की आली. सुरूवातीला चर्चा होती की, धर्मेंद्र प्रधान यांचे खाते बदल केले जाईल. मात्र, अभिजीत दिपके यांनी राजीनामा पाहिजे, खाते बदल नाही, असे स्पष्ट सरकारला सांगितले.
