AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका

देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. (Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका
Rahul Gandhi
| Updated on: Apr 12, 2021 | 3:42 PM
Share

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. (Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

385 दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लसीकरणाचा वेग वाढवा

लसींची निर्मिती करणाऱ्या आवश्यक ती साधनसामुग्री पुरवली पाहिजे. त्यांना सुविधा द्या, म्हणजे लसीचं उत्पादन वाढेल. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिलं 75 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असंही ते म्हणाले.

युद्ध की उत्सव?: चिदंबरम

यावेळी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील सरकार कधी लसीकरण मोहिमेला उत्सव म्हणते तर कधी हे दुसरं युद्ध असल्याचं सांगितलं जातं. नेमकं हे काय आहे? असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. मोदींनी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली होती, तो दिवस आठवा. त्या दिवशी त्यांनी महाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकण्यात आलं होतं. कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकू असं मोदीने म्हटलं होतं. त्या युद्धाचं काय झालं?, असा खोचक सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

मोठमोठ्या गप्पांनी यश मिळणार नाही

पोकळ दावे, वायफळ बडबड आणि मोठमोठ्या गप्पा झोडल्याने कोरोना संसर्गाच्या विरोधात यश मिळणार नाही. आपलं अपयश लपवण्यासाठीच सरकार व्हॅक्सीनच्या पुरवठा आणि वितरणाच्या नियोजन व्यवस्थित करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. (Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : नागपुरात रुग्णालयाबाहेर ॲब्युलन्समध्ये रुग्णांची बेडसाठी प्रतिक्षा

ही घ्या संपूर्ण आकडेवारी, कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्या आणि किती लसी फुकट गेल्या?

रुग्ण बेडवर झोपल्याचा राग अनावर, दुसऱ्या रुग्णाकडून हत्या; यूपीतील धक्कादायक प्रकार

(Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.