ही घ्या संपूर्ण आकडेवारी, कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्या आणि किती लसी फुकट गेल्या?

लसी फुकट जाण्याचे प्रमाण इतर राज्यांमध्ये कितीतरी अधिक आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले होते. | Covid vaccine

ही घ्या संपूर्ण आकडेवारी, कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्या आणि किती लसी फुकट गेल्या?
व्हॅक्सिन हा शब्द कोठून आला? तर, मेरियम-वेबस्टर शब्दकोष म्हणते की व्हॅक्सिन हा शब्द प्रथम 1882 मध्ये वापरला गेला होता. हा शब्द लॅटिन भाषेतील 'व्हॅक्सिनस' (Vaccinus) या स्त्रीलिंगी शब्दापासून आला आहे. या शब्दाचा अर्थ 'गाईपासून निर्माण झालेला' असा होतो.
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 12:30 PM

नवी दिल्ली: सध्या कोरोना लसींच्या वाटपावरून केंद्र सरकार विरुद्ध असा वाद पेटलेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा (Covid vaccine) पुरवठा करावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला कशाबशा 17 लाख लसींचा साठा दिला. (Which state got how many covid vaccine doses and how many doses are wasted vaccination in Maharashtra Gujrat, UP, Delhi and Bihar)

त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकाच्या लसवाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले होते. महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिया रुग्णांची संख्या जास्त असतानाही तुलनेने कमी रुग्ण असलेल्या गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना कोरोना लसवाटपात केंद्र सरकार झुकते माप देत असल्याचा आरोप महाविकासआघाडी सरकारने केला होता.

महाविकासआघाडी सरकारच्या या आरोपाचा प्रतिवाद करताना केंदीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्राने लसी फुकट घालवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांचीच री ओढत महाराष्ट्र सरकारच कसे फोल ठरले आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. हर्षवर्धन हे फुकट गेलेल्या लसींची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहेत, असा प्रत्यारोप केला होता. लसी फुकट जाण्याचे प्रमाण इतर राज्यांमध्ये कितीतरी अधिक आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले होते.

कोणत्या राज्याने किती लसी फुकट घालवल्या?

कोरोनाची लस देताना काही लसी फुकट जात आहेत. लसीची बाटली फुटणे, कोल्ड चेन तुटणे, एक्स्पायरी डेट संपणे, लस फोडल्यानंतर विशिष्ट वेळेत त्याचा वापर न होणे, अशा अनेक कारणांमुळे लसी फुकट जात आहेत. त्यावरुन सध्या बरेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या माहितीनुसार, तामिळनाडू (12.4 टक्के), हरियाणा (10 टक्के) आणि बिहारमध्ये (8.1 टक्के) कोरोना लसींचा सर्वाधिक अपव्यय झाला आहे. तर दिल्ली (7 टक्के), आंध्र प्रदेश (7.3 टक्के), पंजाब (8 टक्के), आसाम (7.3 टक्के) आणि मणीपूरमध्ये 7.2 टक्के लसी फुकट गेल्या आहेत.

राज्यआतापर्यंत किती लसी मिळाल्या?आणखी किती लसी मिळणार?
आंध्र प्रदेश 3,794,920 1,458,170
बिहार 4,644,080 1,096,890
उत्तर प्रदेश 9,209,330 4,798,450
उत्तराखंड 1336,100
ओदिसा 4,344,140 200,000
मध्य प्रदेश 5,819,530 3,376,220
महाराष्ट्र 10,619,190 1,943,280
राजस्थान 10,495,860 383,260
जम्मू-काश्मीर 1,351,600 160,240
झारखंड 2,474,340 2,047,610
पश्चिम बंगाल 8,383340 2,105,970
छत्तीसगढ 4,666,550
दिल्ली 2,370,710 200,000
गुजरात 10,519,330
पंजाब 2,236,770
आसाम 1,781,080 818.740
कर्नाटक 7,057,900 1377,560
हिमाचल प्रदेश 1,116,990 193,160
हरियाणा 3,042,220 1,992,150
केरळ 5,606,790 974,710
तेलंगणा 2 599,230 362280
चंदीगड 180,930
गोवा 180,930
तामिळनाडू 5,428,950 221.440

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

(Which state got how many covid vaccine doses and how many doses are wasted vaccination in Maharashtra Gujrat, UP, Delhi and Bihar)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.