AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारवर आरएसएसचा रिमोट कंट्रोल आहे का?; मोहन भागवतांनी सांगितली ‘मन की बात’

केंद्रातील मोदी सरकारवर आरएसएसचं रिमोट कंट्रोल असल्याची नेहमीच चर्चा असते. या चर्चांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पूर्ण विराम दिला आहे.

मोदी सरकारवर आरएसएसचा रिमोट कंट्रोल आहे का?; मोहन भागवतांनी सांगितली 'मन की बात'
Mohan Bhagwat
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 4:06 PM
Share

धर्मशाला: केंद्रातील मोदी सरकारवर आरएसएसचं रिमोट कंट्रोल असल्याची नेहमीच चर्चा असते. या चर्चांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पूर्ण विराम दिला आहे. मोदी सरकारवर संघाचा रिमोट कंट्रोल नाही, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे.

मोहन भागवत हे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत आहेत. या ठिकाणी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. आमचे काही कार्यकर्ते केंद्रीय सत्तेत आहेत. केंद्र सरकारचं रिमोट संघाच्या हातात असल्याचं मीडियाकडून सांगितलं जातं. पण त्यात तथ्य नाही. हे खोटं आहे. सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतच आश्वासन देत नाही. आम्हाला सरकारकडून काय मिळालं असं विचारलं जातं. या लोकांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे जे काही आहे. ते आम्ही गमावू शकतो, असं भागवत म्हणाले.

सर्वांचा डीएनए एकच

गेल्या 40 हजार वर्षापासून भारतातील लोकांचा डीएनए एकच आहे. आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करत असतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा आहे, असं ते म्हणाले.

विश्व गुरू नक्कीच बनू शकतो

यावेळी त्यांनी प्राचीन उपचार पद्धतीवरही भाष्य केलं. आपल्या परंपरेत पूर्वी काढा घेतला जायचा. आता सर्व जग हेच भारतीय मॉडल स्वीकारत आहे. आपला देश जागतिक महासत्ता बनला नाही तरी विश्व गुरु नक्कीच बनू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

दलाई लामांना भेटणार

या कार्यक्रमावेळी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले सीडीएस बिपीन रावत यांच्यासह इतर 14 जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत अनेक लढायांमध्ये आक्रमकांकडून पराभूत झाला आहे. कारण लोक एकजूट नव्हते, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक विधान उद्धृत केलं. आपण कोणत्याही शक्तीमुळे पराभूत होत नाही. तर आपल्यातीलच कमकुवतपणामुळे पराभूत होत असतो, असंही ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार भागवत हे पाच दिवसाच्या हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. ते तिबेटी धर्म गुरु दलाई लामांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ; फडणवीसांचा घणाघात

Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!

St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.