मोदी सरकारवर आरएसएसचा रिमोट कंट्रोल आहे का?; मोहन भागवतांनी सांगितली ‘मन की बात’

केंद्रातील मोदी सरकारवर आरएसएसचं रिमोट कंट्रोल असल्याची नेहमीच चर्चा असते. या चर्चांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पूर्ण विराम दिला आहे.

मोदी सरकारवर आरएसएसचा रिमोट कंट्रोल आहे का?; मोहन भागवतांनी सांगितली 'मन की बात'
Mohan Bhagwat
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 4:06 PM

धर्मशाला: केंद्रातील मोदी सरकारवर आरएसएसचं रिमोट कंट्रोल असल्याची नेहमीच चर्चा असते. या चर्चांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पूर्ण विराम दिला आहे. मोदी सरकारवर संघाचा रिमोट कंट्रोल नाही, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे.

मोहन भागवत हे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत आहेत. या ठिकाणी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. आमचे काही कार्यकर्ते केंद्रीय सत्तेत आहेत. केंद्र सरकारचं रिमोट संघाच्या हातात असल्याचं मीडियाकडून सांगितलं जातं. पण त्यात तथ्य नाही. हे खोटं आहे. सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतच आश्वासन देत नाही. आम्हाला सरकारकडून काय मिळालं असं विचारलं जातं. या लोकांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे जे काही आहे. ते आम्ही गमावू शकतो, असं भागवत म्हणाले.

सर्वांचा डीएनए एकच

गेल्या 40 हजार वर्षापासून भारतातील लोकांचा डीएनए एकच आहे. आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करत असतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा आहे, असं ते म्हणाले.

विश्व गुरू नक्कीच बनू शकतो

यावेळी त्यांनी प्राचीन उपचार पद्धतीवरही भाष्य केलं. आपल्या परंपरेत पूर्वी काढा घेतला जायचा. आता सर्व जग हेच भारतीय मॉडल स्वीकारत आहे. आपला देश जागतिक महासत्ता बनला नाही तरी विश्व गुरु नक्कीच बनू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

दलाई लामांना भेटणार

या कार्यक्रमावेळी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले सीडीएस बिपीन रावत यांच्यासह इतर 14 जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत अनेक लढायांमध्ये आक्रमकांकडून पराभूत झाला आहे. कारण लोक एकजूट नव्हते, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक विधान उद्धृत केलं. आपण कोणत्याही शक्तीमुळे पराभूत होत नाही. तर आपल्यातीलच कमकुवतपणामुळे पराभूत होत असतो, असंही ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार भागवत हे पाच दिवसाच्या हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. ते तिबेटी धर्म गुरु दलाई लामांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ; फडणवीसांचा घणाघात

Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!

St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.