AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोल्ट्री फार्मच्या ४०० हून अधिक कोंबड्यांना बांबूंनी मारहाण करुन ठार केले, दोघांना अटक

या घटनेनंतर गावकऱ्यांनी दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की जर अशा लोकांवर कठोर पाऊल उचलत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी केली जात आहे.

पोल्ट्री फार्मच्या ४०० हून अधिक कोंबड्यांना बांबूंनी मारहाण करुन ठार केले, दोघांना अटक
poultry farm : file photo
| Updated on: Sep 10, 2025 | 3:15 PM
Share

उत्तर प्रदेशातालील कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर तालुक्यात एका कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अज्ञातांनी शिरुन ४०० हून अधिक कोंबड्यांना बांबूने मारुन त्यांना ठार केल्याचा प्रकार घडला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर घबराट पसरुन शेतकरी संतप्त झाले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन आरोपींना अटक केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कानपुरच्या बिल्हौर तहसीलच्या गोहोलियापुर गावात शुक्रवारी रात्री उशीरा थरकाप उडविणारी ही घटना घडली. गावातील एका कोंबड्यांच्या फार्ममध्ये अचानक सामाजिक तत्वांनी हल्लाबोल करीत काटोरी तारांनी गुंडाळलेल्या बाबूंनी ४०० हून अधिक कोंबड्यांना निदर्यीपणे ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.

शनिवारी सकाळी जेव्हा ही घटना गावकऱ्यांना समजली तर संपूर्ण परिसरात दहशत आणि संतापाचे वातावरण पसरले. इतक्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांना अशा प्रकारे ठार केल्याने या मागे काय हेतू होता याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. या घटनेने गावातील शांतता आणि सुरक्षा दोन्हीसाठी गंभीर धोका उत्पन्न निर्माण झाला आहे.

४०० हून अधिक कोंबड्यांना निदर्यीपणे ठार केले

माहिती मिळताच बिल्हौर कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना मृत कोंबड्यांचा पोस्टमार्टेम करण्यासाठी सरकारी पशु आरोग्य अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. या दरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघा आरोपींवर गुंडगिरी केल्याचे आणि यापूर्वी गावात अराजकता पसरवल्याचे आरोप आहेत. यांच्या गुंडगिरीमुळे गावकरी आधीपासूनच त्रस्त आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून अशी घटना पुन्हा होऊ नये अशी मागणी केली आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.