AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 लाख अशक्य म्हणणारे 1 कोटी नोकऱ्या देतील का? तेजस्वींचा सवाल

बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना, इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी त्यांची दृष्टी, रोजगार योजना आणि आर्थिक न्याय अजेंड्यावर उघडपणे भाष्य केले आहे. जाणून घेऊया.

10 लाख अशक्य म्हणणारे 1 कोटी नोकऱ्या देतील का? तेजस्वींचा सवाल
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Nov 04, 2025 | 4:42 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी विकास, रोजगार आणि आर्थिक न्यायाचा आपला दृष्टिकोन मांडला आहे. एका मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, ‘माझे वय कमी असले तरी माझी आश्वासने परिपक्व आहेत. या संवादात तेजस्वी यादव यांनी रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सर्वसमावेशक बिहार निर्माण करण्याच्या त्यांच्या योजनांची माहिती दिली.

”तुम्ही लोकांना कोणती आश्वासने देत आहात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे?” या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले की, ‘’आम्ही बिहारला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प केला आहे आणि तेच आमचे अंतिम ध्येय आहे. आमचा दृष्टिकोन असा बिहार निर्माण करण्याचे आहे, जिथे कोणत्याही बिहारी बंधू-भगिनीला काम किंवा संधीच्या शोधात स्थलांतर करावे लागू नये. प्रत्येक सुविधा आणि संधी येथेच, आपल्या राज्यात उपलब्ध असायला हवी. बिहारमध्ये कारखाने आणि रोजगाराच्या संधी असाव्यात, तसेच चांगल्या दर्जाची रुग्णालये, महाविद्यालये आणि विद्यापीठे असावीत. कारखाने उभारणे, गिरण्या पुन्हा सुरू करणे, अन्न प्रक्रिया युनिट उभारणे आणि नवीन आयटी पार्क आणि सेझ विकसित करणे हे आमचे ध्येय आहे.’’

‘’आम्हाला बिहारला शैक्षणिक केंद्र बनवायचे आहे जेणेकरून कोटासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी जावे लागू नये आणि आम्हाला चांगली रुग्णालये उभी करायची आहेत जेणेकरून लोकांना उपचारांसाठी राज्याबाहेर जावे लागू नये. आज, बिहार हे सर्वात गरीब राज्यांपैकी एक आहे, जिथे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्यसेवा, उत्पन्न, संधी आणि न्याय मिळेल आणि सरकार खऱ्या अर्थाने कृतीभिमुख आहे हे सुनिश्चित करून ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बिहारमध्ये धार्मिक, वारसा आणि सामान्य पर्यटनासारख्या क्षेत्रात अपार संधी आहेत. आम्हाला हे सामर्थ्य विकसित करायचे आहे आणि बिहारला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचे आहे. बिहारमध्ये बदल हवा असलेल्या लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

”प्रत्येक कुटुंबाला नोकऱ्या कशा देणार?” यावर तेजस्वी म्हणालेत की, ‘’लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या. मागच्या वेळी देखील ते म्हणत होते की, 10 लाख नोकऱ्या देणे अशक्य आहे. आता तेच लोक – भाजप आणि जेडीयू – स्वत: रोजगाराबद्दल बोलण्यास भाग पाडले जात आहेत आणि ते म्हणत आहेत की ते एक कोटी नोकऱ्या देतील. आम्ही जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण केले आहे.’’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.