AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 लाख अशक्य म्हणणारे 1 कोटी नोकऱ्या देतील का? तेजस्वींचा सवाल

बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना, इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी त्यांची दृष्टी, रोजगार योजना आणि आर्थिक न्याय अजेंड्यावर उघडपणे भाष्य केले आहे. जाणून घेऊया.

10 लाख अशक्य म्हणणारे 1 कोटी नोकऱ्या देतील का? तेजस्वींचा सवाल
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Nov 04, 2025 | 4:42 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी विकास, रोजगार आणि आर्थिक न्यायाचा आपला दृष्टिकोन मांडला आहे. एका मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, ‘माझे वय कमी असले तरी माझी आश्वासने परिपक्व आहेत. या संवादात तेजस्वी यादव यांनी रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सर्वसमावेशक बिहार निर्माण करण्याच्या त्यांच्या योजनांची माहिती दिली.

”तुम्ही लोकांना कोणती आश्वासने देत आहात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे?” या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले की, ‘’आम्ही बिहारला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प केला आहे आणि तेच आमचे अंतिम ध्येय आहे. आमचा दृष्टिकोन असा बिहार निर्माण करण्याचे आहे, जिथे कोणत्याही बिहारी बंधू-भगिनीला काम किंवा संधीच्या शोधात स्थलांतर करावे लागू नये. प्रत्येक सुविधा आणि संधी येथेच, आपल्या राज्यात उपलब्ध असायला हवी. बिहारमध्ये कारखाने आणि रोजगाराच्या संधी असाव्यात, तसेच चांगल्या दर्जाची रुग्णालये, महाविद्यालये आणि विद्यापीठे असावीत. कारखाने उभारणे, गिरण्या पुन्हा सुरू करणे, अन्न प्रक्रिया युनिट उभारणे आणि नवीन आयटी पार्क आणि सेझ विकसित करणे हे आमचे ध्येय आहे.’’

‘’आम्हाला बिहारला शैक्षणिक केंद्र बनवायचे आहे जेणेकरून कोटासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी जावे लागू नये आणि आम्हाला चांगली रुग्णालये उभी करायची आहेत जेणेकरून लोकांना उपचारांसाठी राज्याबाहेर जावे लागू नये. आज, बिहार हे सर्वात गरीब राज्यांपैकी एक आहे, जिथे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्यसेवा, उत्पन्न, संधी आणि न्याय मिळेल आणि सरकार खऱ्या अर्थाने कृतीभिमुख आहे हे सुनिश्चित करून ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बिहारमध्ये धार्मिक, वारसा आणि सामान्य पर्यटनासारख्या क्षेत्रात अपार संधी आहेत. आम्हाला हे सामर्थ्य विकसित करायचे आहे आणि बिहारला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचे आहे. बिहारमध्ये बदल हवा असलेल्या लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

”प्रत्येक कुटुंबाला नोकऱ्या कशा देणार?” यावर तेजस्वी म्हणालेत की, ‘’लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या. मागच्या वेळी देखील ते म्हणत होते की, 10 लाख नोकऱ्या देणे अशक्य आहे. आता तेच लोक – भाजप आणि जेडीयू – स्वत: रोजगाराबद्दल बोलण्यास भाग पाडले जात आहेत आणि ते म्हणत आहेत की ते एक कोटी नोकऱ्या देतील. आम्ही जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण केले आहे.’’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...