AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 लाख अशक्य म्हणणारे 1 कोटी नोकऱ्या देतील का? तेजस्वींचा सवाल

बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना, इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी त्यांची दृष्टी, रोजगार योजना आणि आर्थिक न्याय अजेंड्यावर उघडपणे भाष्य केले आहे. जाणून घेऊया.

10 लाख अशक्य म्हणणारे 1 कोटी नोकऱ्या देतील का? तेजस्वींचा सवाल
फाईल फोटो
| Updated on: Nov 04, 2025 | 4:42 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी विकास, रोजगार आणि आर्थिक न्यायाचा आपला दृष्टिकोन मांडला आहे. एका मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, ‘माझे वय कमी असले तरी माझी आश्वासने परिपक्व आहेत. या संवादात तेजस्वी यादव यांनी रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सर्वसमावेशक बिहार निर्माण करण्याच्या त्यांच्या योजनांची माहिती दिली.

”तुम्ही लोकांना कोणती आश्वासने देत आहात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे?” या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले की, ‘’आम्ही बिहारला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प केला आहे आणि तेच आमचे अंतिम ध्येय आहे. आमचा दृष्टिकोन असा बिहार निर्माण करण्याचे आहे, जिथे कोणत्याही बिहारी बंधू-भगिनीला काम किंवा संधीच्या शोधात स्थलांतर करावे लागू नये. प्रत्येक सुविधा आणि संधी येथेच, आपल्या राज्यात उपलब्ध असायला हवी. बिहारमध्ये कारखाने आणि रोजगाराच्या संधी असाव्यात, तसेच चांगल्या दर्जाची रुग्णालये, महाविद्यालये आणि विद्यापीठे असावीत. कारखाने उभारणे, गिरण्या पुन्हा सुरू करणे, अन्न प्रक्रिया युनिट उभारणे आणि नवीन आयटी पार्क आणि सेझ विकसित करणे हे आमचे ध्येय आहे.’’

‘’आम्हाला बिहारला शैक्षणिक केंद्र बनवायचे आहे जेणेकरून कोटासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी जावे लागू नये आणि आम्हाला चांगली रुग्णालये उभी करायची आहेत जेणेकरून लोकांना उपचारांसाठी राज्याबाहेर जावे लागू नये. आज, बिहार हे सर्वात गरीब राज्यांपैकी एक आहे, जिथे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्यसेवा, उत्पन्न, संधी आणि न्याय मिळेल आणि सरकार खऱ्या अर्थाने कृतीभिमुख आहे हे सुनिश्चित करून ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बिहारमध्ये धार्मिक, वारसा आणि सामान्य पर्यटनासारख्या क्षेत्रात अपार संधी आहेत. आम्हाला हे सामर्थ्य विकसित करायचे आहे आणि बिहारला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचे आहे. बिहारमध्ये बदल हवा असलेल्या लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

”प्रत्येक कुटुंबाला नोकऱ्या कशा देणार?” यावर तेजस्वी म्हणालेत की, ‘’लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या. मागच्या वेळी देखील ते म्हणत होते की, 10 लाख नोकऱ्या देणे अशक्य आहे. आता तेच लोक – भाजप आणि जेडीयू – स्वत: रोजगाराबद्दल बोलण्यास भाग पाडले जात आहेत आणि ते म्हणत आहेत की ते एक कोटी नोकऱ्या देतील. आम्ही जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण केले आहे.’’

या औलादी माझ्या मुळावर, आता मी सांगतो.. इंदुरीकरांचं थेट चॅलेंज काय?
या औलादी माझ्या मुळावर, आता मी सांगतो.. इंदुरीकरांचं थेट चॅलेंज काय?.
10 हजारामुळ महिलानी पटलवला गेम? बिहारवर पवारांचा तर्क अन् आयोगाला सवाल
10 हजारामुळ महिलानी पटलवला गेम? बिहारवर पवारांचा तर्क अन् आयोगाला सवाल.
मविआत फूट, काँग्रेस स्वतंत्र लढणार... मुंबईत फायदा महायुतीचाच?
मविआत फूट, काँग्रेस स्वतंत्र लढणार... मुंबईत फायदा महायुतीचाच?.
अजित पवार अन् शाह यांची भेट, पार्थ पवार यांचा अँगल? चर्चांना उधाण
अजित पवार अन् शाह यांची भेट, पार्थ पवार यांचा अँगल? चर्चांना उधाण.
आधी कोठारे आता निवेदिता... भाजपला समर्थन अन् विरोधकांना अडचण?
आधी कोठारे आता निवेदिता... भाजपला समर्थन अन् विरोधकांना अडचण?.
मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?
मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?.
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान.
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता.
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?.
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या.