Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हाच सध्या एकमेव उपाय असल्याचे जैन यांनी सांगितले. (New Delhi Health Minister Satyendra Jain third corona waive started in Mask is only option to prevent corona)

Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल.
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 2:51 PM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले आहे. दररोजच्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आतापर्यंतची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, असं सत्येंद्र जैन म्हणाले. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हाच सध्या एकमेव उपाय असल्याचे जैन यांनी सांगितले. (New Delhi Health Minister Satyendra Jain third corona waive started in Mask is only option to prevent corona)

आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी नवी दिल्लीत सरकारनं कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या वाढवली असल्याची माहिती दिली. मात्र, कोरोना रुग्णांसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचे नियोजन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना रुग्ण संख्या लवकरच कमी होणार

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरु असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, लवकरच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला नागरिकांची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचही आरोग्यमंत्री जैन म्हणाले. काही लोकांना मास्क नाही घातला तर काही होत नाही, असं वाटतं हे चुकीचे आहे, असंही जैन म्हणाले.

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज साधारणपणे 7 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी 500 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.

दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये 685 कोरोना बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयामधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. राज्य सरकारच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टानं स्थगिती दिली. यानंतर दिल्ली सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

“दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत कोरोनाची ही तिसरी लाट आहे, असंही म्हणता येईल”, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चार दिवसांपूर्वी केले होते. दिल्लीत कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमणाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.

संबंधित बातम्या :

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, नव्या बाधितांमध्ये प्रचंड वाढ : अरविंद केजरीवाल

(New Delhi Health Minister Satyendra Jain third corona waive started in Mask is only option to prevent corona)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.