AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार? लसीकरणाबाबत राहुल गांधींचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस निर्मिती केंद्रांना भेट दिल्यानंतर भारतातही लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला आहे.

मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार? लसीकरणाबाबत राहुल गांधींचा सवाल
| Updated on: Dec 23, 2020 | 11:17 AM
Share

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या मुद्द्यावर ब्रिटनसह अमेरिका, चिनलाही चिंता लागून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस निर्मिती केंद्रांना भेट दिल्यानंतर भारतातही लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला आहे. (Rahul Gandhi question to PM Narendra Modi about corona vaccination)

“जगभरात 23 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशियातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार?”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलंय.

‘लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त’

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटीच्या पुढे गेल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. काही तयारी न करताच लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

“कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी झाली आहे आणि जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी दावा केला होता. पण अनियोजित लॉकडाऊनमुळे 21 दिवसांत लढाई जिंकली जाऊ शकत नाही. त्यामुळे देशात कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं”, असं ट्विट राहुल गांधी यांनी 19 डिसेंबरला केलं होतं.

ब्रिटीश निर्मित कोरोना लसीला भारतात मंजुरी मिळणार?

भारताकडून ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोनाव्हायरस लसीला तातडीच्या वापरासाठी पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटीश औषध निर्मात्याच्या लसीसाठी हिरवा कंदील देणारा भारत हा पहिला देश असू शकतो. फायझर इंक आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींसाठी ही आपत्कालीन वापराच्या अधिकृतता अर्जांवर विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांना कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?

Rahul Gandhi question to PM Narendra Modi about corona vaccination

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.