तडजोड नाहीच, CJP ने वाढवली सरकारची धडधड, प्रधानांच्या राजीनाम्याबाबत पत्रकार परिषदेत गरजला सौरभ दास, पोलिसांविरोधात कोर्टात जाणार?

CJP Firm On Dharmendra Pradhan Resignation: सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण सोडले. सरकारला अर्धी लढाई जिंकल्याचे बळ मिळाले आहे. पण त्याचवेळी कॉक्रोज जनता पार्टीने सरकारची धडधड वाढवली आहे. आता तडजोड नाहीच, असा नारा सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दिला आहे. त्याचवेळी मारहाण करणाऱ्या पोलिसांचाही समाचार त्यांनी घेतला.

तडजोड नाहीच, CJP ने वाढवली सरकारची धडधड, प्रधानांच्या राजीनाम्याबाबत पत्रकार परिषदेत गरजला सौरभ दास, पोलिसांविरोधात कोर्टात जाणार?
तडजोड नाहीच, CJP ने वाढवली सरकारची धडधड सौरभ दास
| Updated on: Jul 24, 2026 | 12:11 PM

CJP Spokesperson Saurabh Das: सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. गेल्या 26 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. सरकारने एक उसासा टाकला. अर्धी लढाई जिंकली असली तरी सरकारची कॉक्रोच जनता पार्टीने धडधड वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घ्या अशी मागणी CJP ने रेटली. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी जंतर मंतरवर नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात पहिलीच मागमी प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. या मागणीवर कोणतीच तडजोड करणार नसल्याचे सीजेपीने स्पष्ट केले आहे. सरकारची चिंता यामुळे वाढली आहे.

त्या पोलिसांचे व्हिडिओ द्या, न्यायालयात जाणार

ज्या पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. त्यांना अमानुष मारहाण केली. आंदोलनातील तरुणींना झोडपले. त्यांच्या छातीवर पाय दिला. याविषयीचे कोणतेही व्हिडिओ असेल तर ते द्या. आम्ही या गुंड पोलिसांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सौरभ दास याने जंतरमंतरच्या पत्रकार परिषदेतून जाहीर केले. असे व्हिडिओ अपलोड करा. सीजेपीची विंग ते व्हिडिओ तपासेल. असे कृत्य करणाऱ्या पोलिसांची ओळख पटवण्यात येईल आणि त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास सांगणार. जर दिल्ली पोलिसांनी आमची विनंती धुडकावली तर आम्ही कोर्टात जाणार असा इशारा त्यांनी दिला. वकिलांची टीम आम्हाला मदत करेल असा दावा त्यांनी केला.

ते पोलीस तुरूंगात असतील

अशा गुंड पोलिसांची यादी तयार करण्यात येईल. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जाण्यासाठी प्रयत्न करू. गुन्हा नोंदवला म्हणजे आम्ही विसरून जाऊ असे होणार नाही. हे गुंड आहेत. ज्यावेळी वेळ येईल, त्यावेळी हे गुंड पोलीस तुरुंगात असतील याची आम्ही काळजी घेऊ असा सज्जड इशारा सौरभ दास यांनी दिला. पोलिसांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. लवकरच ती वेळ येणार आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो असे मोठे संकेतही सौरभ दास यांनी दिले.

दिल्लीत पोलिसांची नाकाबंदी

20 जुलै रोजी आंदोलन झाले. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीत अनेक ठिकाणी नाकाबंदी केल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे. याठिकाणी कॅब थांबवण्यात येत आहे. ऑटो वा इतर वाहन असेल तर ते थांबवले जात आहे. त्यात जर मुलं, तरुण, विद्यार्थी असतील तर त्यांना थेट ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेण्यात येत असल्याचा आरोप सीजेपी सदस्य रत्ना यांनी केला आहे. आज केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळाशी दुपारी सीजेपीची चर्चा होणार असल्याचे सौरभ दास यांनी स्पष्ट केले. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणतीच तडजोड होणार नसल्याचे सीजेपीने स्पष्ट केले आहे.

Follow Us