AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळाले नाही; विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच दिली अशी शिक्षा

विद्यार्थ्यांच्या या करामतीमुळं गोंधळ उडाला. शाळेच्या बाहेर गर्दी जमा झाली. शिक्षण विभागाचे प्रमुख घटनास्थळी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळाले नाही; विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच दिली अशी शिक्षा
| Updated on: Jan 21, 2023 | 4:26 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना काळात युपी (Uttar Pradesh) सरकारने सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (students) मध्यान्ह भोजनाचे पैसे दिले. पण, बलिया भागातील सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे (mid-day meal) पैसे मिळाले नाही. मध्यान्ह भोजनाचे पैसे मागितल्यानंतर शाळा प्रशासन त्याकडं दुर्लक्ष करत होते. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकासह पूर्ण कर्मचाऱ्यांना शाळेच्या खोलीत बंद केले. ही घटना बलिया विभागातील दुर्जनपूर कम्पोझिट विद्यालयात घडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना बंधक बनविले. वर्ग आठवीच्या धीरजने सांगितले की, कोविड काळात मिळणे अपेक्षित असलेले मध्यान्ह भोजनाचे पैसे अजूनपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत.

आम्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पैसे देण्यासंबंधात विचारणा केली. दोन-तीन महिन्यानंतर मिळतील, असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. पण, वाट पाहूनही मध्यान्ह भोजनाचे पेसे मिळाले नाही. त्यामुळं मुख्याध्यापकासह शिक्षकांना शाळेतील खोलीत बंद करण्यात आले. जोपर्यंत उच्च अधिकारी येणार नाही तोपर्यंत बंदिस्त करून ठेवणार होतो.

त्यानंतर विद्यार्थी शांत झाले

विद्यार्थ्यांच्या या करामतीमुळं गोंधळ उडाला. शाळेच्या बाहेर गर्दी जमा झाली. शिक्षण विभागाचे प्रमुख घटनास्थळी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना खोलीच्या बाहेर येऊ दिले.

मुख्याध्यापक म्हणाले,…

दुर्जनपूर कम्पोझिट विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जयप्रकाश यादव म्हणाले, चौथ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत. यासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांना कळविले आहे. लवकरच विद्यार्थ्यांना त्यांच्या मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळतील.

या घटनेमुळं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. सरकारी योजना चांगल्या आहेत. पण, या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ही अंमलबजावणी होत नसेल, तर अशा घटना घडतात. त्यामुळं अंमलबजावणीतील त्रृटी दूर करणे आवश्यक आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.