AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी 10 किलो मटन द्या, मग अंत्यसंस्कार…महिलेचा मृतदेह पडून, नेमक प्रकरण काय?

एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी 10 किलो मटन द्या, मग अंत्यसंस्कार अशी अजब मागणी करण्यात आली. हे नेमक प्रकरण काय?

आधी 10 किलो मटन द्या, मग अंत्यसंस्कार...महिलेचा मृतदेह पडून, नेमक प्रकरण काय?
mutton demand
| Updated on: Mar 20, 2024 | 8:55 AM
Share

मयूरभंज : सामूहिक भोजनाची व्यवस्था केली नाही, म्हणून दोन दिवस एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. 10 किलो मटनाच्या मागणीमुळे तिचा मृतदेह घरातच पडून होता. सामूहिक भोजन दिल नाही, म्हणून गावकऱ्यांनी अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. मृत महिलेच्या मुलाने मटनाची व्यवस्था केल्यानंतर अंत्यसंस्कार झाले. मानवतेला लाज आणणारी ही घटना ओदिशा मयूरभंजची आहे.

गावात अंत्यसंस्काराच्यावेळी सामूहिक भोजन देण्याची प्रथा आहे. मृत महिलेच्या मुलाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तो गावकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करु शकला नाही. म्हणून गावकऱ्यांनी अत्यंसंस्कारात सहभागी होण्यास नकार दिला. त्यांनी मुलासमोर 10 किलो मटनाची अट ठेवली. या मटनाची व्यवस्था करण्यासाठी त्याला दोन दिवस लागले. दोन दिवसानंतर त्याच्या आईवर अंत्यसंस्कार झाले. या दरम्यान दोन दिवस महिलेचा मृतदेह घरात पडून होता.

गावची प्रथा काय?

मयूरभंज तेलाबिलाच हे प्रकरण आहे. या गावात राहणाऱ्या 70 वर्षीय सोम्बारी सिंह या महिलेच निधन झालं. गावात विवाह आणि मृत्यूच्यावेळी सामूहिक भोजन देण्याची प्रथा आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांची गावासाठी भोजन आयोजित करण्याची आर्थिक स्थिती नव्हती. गावकऱ्यांची 10 किलो मटनाची मागणी पूर्ण करण्यासाठी ते असमर्थ होते. म्हणून ग्रामीणांनी अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास नकार दिला.

गावकऱ्यांच म्हणण काय?

गावकऱ्यांच म्हणण असं आहे की, सोम्बारी कुटुंबात याआधी दोन लग्न झाली. त्यावेळी भोजनाची व्यवस्था केली नव्हती. गावकऱ्यांच्या मनात याचा राग होता. शनिवारी सोम्बारीच निधन झालं. गावात मृत्यू झाल्यानंतर सामूहिक भोजन देण्याची परंपरा आहे. याआधी दोन मंगल कार्याच्यावेळी जेवण दिलं नाही, म्हणून गावकऱ्यांनी 10 किलो मटनाची मागणी केली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.